Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | नाती दृढ करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या, चाणक्य निती काय सांगते…

चाणक्य एक महान विद्वान होते. ते मुत्सद्देगिरी, राजकारणात सर्वाधिक कुशल होते. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथात प्रत्येक गोष्टीची माहिती दिली आहे. एखादी व्यक्ती आपल्या जीवनात मजबूत संबंध कसे निर्माण करु शकते आणि त्याच्याकडे कोणते गुण असले पाहिजेत याबाबत आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

Chanakya Niti | नाती दृढ करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या, चाणक्य निती काय सांगते...
दुराचारी, कुदृष्टी व्यक्ती आणि वाईट ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीशी कधीही मैत्री करू नये. असे लोक तुम्हाला केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच अडचणीत टाकतात.
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 7:30 AM

मुंबई : प्रत्येकाला इतरांशी चांगले संबंध हवे असतात. मग ते व्यवसाय असो किंवा वैयक्तिक संबंध. आचार्य चाणक्य यांच्या मते, चांगल्या संबंधांमुळे माणूस प्रत्येक समस्येवर मात करतो. चांगले संबंध कोणत्याही व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यास मदत करतात. कठीण काळात ते तुम्हाला साथ देतात. चाणक्य म्हणतात की या सर्व गोष्टी पूर्णपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतात (Acharya Chanakya Said Some Things To Follow For Strong Relationship In Chanakya Niti).

चाणक्य एक महान विद्वान होते. ते मुत्सद्देगिरी, राजकारणात सर्वाधिक कुशल होते. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथात प्रत्येक गोष्टीची माहिती दिली आहे. एखादी व्यक्ती आपल्या जीवनात मजबूत संबंध कसे निर्माण करु शकते आणि त्याच्याकडे कोणते गुण असले पाहिजेत याबाबत आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. आचार्य चाणक्य नातेसंबंधांबद्दल काय म्हणतात जाणून घ्या

नात्यात प्रेम आणि विश्वास

प्रत्येकाला आनंदी ठेवणे कोणत्याही व्यक्तीसाठी सोपे नसते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण फसवणुकीचा अवलंब करावा. या गोष्टी नातेसंबंध मजबूत ठेवत नाहीत. फसवणूक केल्याने काही दिवसातच नात्यात खंड पडतो. असे केल्याने केवळ संबंध बिघडत नाहीत तर अपमानालाही सामोरे जावे लागते. चाणक्य म्हणतात की नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वासाचा पाया असावा.

गोडवा ठेवा

आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा आणि नम्रता असली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रेम असावे. गोड बोलणे कठोर मनाच्या व्यक्तीचेही मन जिंकू शकते. त्यामुळे तुमच्या बोलण्यात नेहमीच गोडवा असावा.

अहंकाराला मध्ये येऊ देऊ नये

अहंकार कोणत्याही व्यक्तीसाठी हानिकारक असतो. यामुळे, कोणतेही संबंध बिघडू शकतात. चाणक्याच्या मते, कोणत्याही व्यक्तीचा अहंकार इतका मोठा नसावा की तो नात्यांपेक्षा मोठा झाला पाहिजे.

नात्यांमध्ये आदर राखणे

कोणत्याही नात्यात आदर राखणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक नात्यात सन्मान राखणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, रागाच्या भरात, कोणालाही खाली दाखवण्याचा किंवा दुखावण्याचा प्रयत्न करु नये. आपला अहंकार सोडून द्या आणि योग्य गोष्टींना सहकार्य करा. अशा व्यक्तीला समाजात नेहमीच सन्मान मिळेल.

Acharya Chanakya Said Some Things To Follow For Strong Relationship In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कधीही आर्थिक चणचण भासणार नाही

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.