AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaturmas 2023 : यंदा चार नाही तर पाच महिन्यांचा असेल चातुर्मास, या तारखेला असेल देवशयनी आणि देवउठी एकादशी

चातुर्मासाच्या 4 महिन्यांत जास्तीत जास्त वेळ देवाची आराधना आणि भक्ती करण्यात जातो. विविध नियम पाळले जातात. ऋषी-मुनी चातुर्मासात प्रवास करत नाहीत तर एकाच ठिकाणी थांबून भगवंताच्या भक्तीत तल्लीन राहतात.

Chaturmas 2023 : यंदा चार नाही तर पाच महिन्यांचा असेल चातुर्मास, या तारखेला असेल देवशयनी आणि देवउठी एकादशी
भगवान विष्णूImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 10:50 AM

मुंबई : सनातन धर्मात चातुर्मास (Chaturmas 2023) अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यांत जास्तीत जास्त वेळ देवाची आराधना आणि भक्ती करण्यात जातो. विविध नियम पाळले जातात. ऋषी-मुनी चातुर्मासात प्रवास करत नाहीत तर एकाच ठिकाणी थांबून भगवंताच्या भक्तीत तल्लीन राहतात. भगवान विष्णू ज्या वेळेला योगनिद्रामध्ये मग्न असतात त्याला चातुर्मास म्हणतात. देवशयनी एकादशी आणि देवउठी एकादशी दरम्यानचा काळ म्हणजे चातुर्मास असतो.

देवशयनी आणि देवउठी एकादशीची तारीख

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री हरी विश्रांतीसाठी जातात. यावर्षी देवशयनी एकादशी 29 जून 2023 रोजी येत आहे. दुसरीकडे, देवउठी एकादशीला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. यासोबतच 4 महिन्यांपासून थांबलेली शुभ कार्ये सुरू होतात. 2023 मध्ये देवउठी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. श्रावण महिन्यात अधिक मास असल्याने या वर्षी श्रावण महिना 2 महिन्यांचा तर चातुर्मास 5 महिन्यांचा असेल. म्हणजेच शुभ कार्य करण्यासाठी 1 महिन्यापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागते.

हे सुद्धा वाचा

चातुर्मासात या गोष्टी अवश्य पाळा

  1. चातुर्मासात लग्न, मुंज, मुंडण, वास्तू, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी कोणतेही शुभ कार्य करू नये. चातुर्मासाचा काळ केवळ उपासनेसाठी योग्य आहे.
  2.  चातुर्मासात मांसाहार, दारू, मुळा, वांगी, लसूण-कांदा यांचे सेवन करू नये.
  3. चातुर्मासात एकांतात राहून ब्रह्मचर्य पाळावे.
  4. असे मानले जाते की, जो व्यक्ती चातुर्मासात गायींची काळजी घेतो आणि अन्नपदार्थ दान करतो. त्याच्यावर देवी-देवतांची विशेष कृपा सदैव राहते. या 4 महिन्यांत अन्न आणि गाईचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की या उपायाने अडकलेले पैसे परत मिळतात आणि कर्जाची समस्याही दूर होते.
  5. या चार महिन्यात सूर्यदेव, भगवान विष्णू, भगवान शिव, भगवान गणेश आणि देवी पार्वतीच्या उपासनेचे विशेष महत्त्व मानले जाते.
  6. चातुर्मासात हरभरा आणि गुळाचे दान केल्यास नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी मंदिरात कापूर दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबात सुख-शांती राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....