Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Door Vastu Tips : दाराशी संबंधित वास्तुदोषामुळे येते दुर्भाग्य, दूर करण्यासाठी करा हे उपाय

घर बांधताना सर्वप्रथम मुख्य दरवाजाच्या दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तूनुसार पूर्व दिशेला बांधलेला मुख्य दरवाजा खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिशेला बनवलेले मुख्य द्वार घराच्या प्रमुखासाठी भाग्यवान सिद्ध होते आणि त्याला विविध स्त्रोतांमधून उत्पन्न मिळते.

Door Vastu Tips : दाराशी संबंधित वास्तुदोषामुळे येते दुर्भाग्य, दूर करण्यासाठी करा हे उपाय
दाराशी संबंधित वास्तुदोषामुळे येते दुर्भाग्य
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 7:07 PM

मुंबई : अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनाच्या तीन मूलभूत गरजा आहेतय यापैकी एक असलेले स्वप्नातील घर बनवताना आपण वास्तु नियमांची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या लोकांना सुख-समृद्धी हवी असेल, त्यांनी विशेषत: घराचा मुख्य दरवाजा नेहमी वास्तुनुसारच बनवावा, कारण अशा प्रकारे तुमच्या घरात सुखाचे आगमन होते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात अचानक कलह आणि त्रास वाढू लागला आहे आणि तयार केलेले काम बिघडू लागले आहे, तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाशी संबंधित या वास्तु नियमांनुसार एकदा लक्ष द्यावे. तसेच मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तू दोष लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

या दिशेला शुभ असतो मुख्य दरवाजा

घर बांधताना सर्वप्रथम मुख्य दरवाजाच्या दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तूनुसार पूर्व दिशेला बांधलेला मुख्य दरवाजा खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिशेला बनवलेले मुख्य द्वार घराच्या प्रमुखासाठी भाग्यवान सिद्ध होते आणि त्याला विविध स्त्रोतांमधून उत्पन्न मिळते. इंद्र हा पूर्व दिशेचा स्वामी आहे. मुख्य दरवाजा या दिशेला केल्याने त्या घराच्या प्रमुखाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

घराच्या दारांची संख्या किती असावी

वास्तूनुसार घराच्या दारांची संख्या कधीही विषम नसावी. वास्तूमध्ये हा एक मोठा दोष मानला जातो. अशा स्थितीत तुम्ही घरामध्ये दरवाज्यांची संख्या नेहमी 2, 4, 6, 8, 12 ठेवू शकता, परंतु दरवाजांची संख्या चुकूनही 10 असू नये, कारण वास्तूमध्ये हे शुभ मानले जात नाही.

मुख्य दरवाजाचा आकार किती असावा

घराचे मुख्य प्रवेशद्वार बनवताना, त्याच्या आकाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तू सुंदर बनवण्याच्या प्रक्रियेत नियमांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. वास्तूनुसार मुख्य दरवाजाची लांबी नेहमी रुंदीच्या दुप्पट असावी.

मुख्य दरवाजाला वास्तूनुसार रंग द्या

वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजाची दिशा आणि आकार याशिवाय त्याच्या रंगावरही विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तु नियमांनुसार घराच्या मुख्य दरवाजाला पांढरा, हलका निळा किंवा हलका हिरवा रंग लावणे नेहमीच शुभ असते. मुख्य दरवाजा कधीही काळ्या रंगाने रंगवू नका.

दाराशी संबंधित वास्तु दोष आणतो दुर्भाग्य

जर तुमच्या घराचे दरवाजे उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असेल किंवा ते उघडताना किंवा बंद करताना काही अडचण येत असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करा, कारण दाराशी संबंधित अशा दोषांमुळे मोठ्या प्रमाणात कलह आणि दुर्भाग्य निर्माण होते. (Door Vastu Tips, do this remedies for remove your architectural defects)

इतर बातम्या

Chhath Puja 2021: दिल्लीत यमुना नदीच्या विषारी फेसाच्या पाण्यात भाविकांनी केली छठ पुजा ! बघा फोटो

Shiv Puja Tips | सर्व प्रकारचे भय, रोग, दुःख दूर होतील, महादेवाच्या पुजेत 5 गोष्टी केल्यास इच्छाप्राप्ती होईल

ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.