Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपयश पाचवीला पुजले आहे? कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाहीये मग हे ज्योतिष उपाय नक्की फाॅलो करा!

जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक लोक कठोर परिश्रम घेतात. परंतु तरीही त्यांचा संघर्ष (Struggle) सुरूच असतो. इतके कष्ट करूनही त्यांना हवे तसे यश मिळवता येत नाही. साध्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना खूप जास्त अडचणींचा सामना करावा लागतो.

अपयश पाचवीला पुजले आहे? कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाहीये मग हे ज्योतिष उपाय नक्की फाॅलो करा!
वास्तू टिप्स
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 12:46 PM

मुंबई : जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक लोक कठोर परिश्रम घेतात. परंतु तरीही त्यांचा संघर्ष (Struggle) सुरूच असतो. इतके कष्ट करूनही त्यांना हवे तसे यश मिळवता येत नाही. साध्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना खूप जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. यामागे अनेक कारणे असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे ज्योतिषशास्त्राशी संबंधित (Jyotish Shastra) नियम. या नियमांकडे दुर्लक्ष करणे शुभ मानले जात नाही.

आपण बऱ्याच वेळा ऐकतो की, मी अभ्यास खूप करतो पण माझे लक नसल्यामुळे मला नोकरी लागत नाहीये. मात्र, ज्योतिषशास्त्राशी संबंधित नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनातील या समस्या देखील दूर होऊ शकतात. आपल्या सर्वांच्याच स्वयंपाक घरामध्ये साखर असते आणि ही साखर अनेक प्रकारे दु:ख दूर करू शकते. जाणून घ्या यासंबंधीचे ज्योतिष उपाय…

1. असे म्हटले जाते की साखरेचा ग्रहांशी संबंध असतो. त्यामुळे विशेष प्रसंगी तिचा गोडवा समाविष्ट करणे खूप शुभ मानले जाते. जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर तो त्याच्याशी संबंधित उपाय देखील करू शकतो. तांब्याच्या भांड्यात साखर मिसळून पाणी प्यायल्याने सूर्याची स्थिती मजबूत होते.

2. राहू ग्रहावरही साखर गुणकारी मानली जाते. यावर उपाय म्हणून रात्री झोपताना लाल कपड्यात साखर बांधून डोक्याखाली ठेवा. यामुळे कुंडलीत राहूची समस्या दूर होण्यास मदत होईल.

3. घरातून बाहेर पडताना जर तुम्ही करिअरशी संबंधित कोणत्याही शुभ कामासाठी बाहेर जात असाल तर साखरेचा उपाय करायला विसरू नका. तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी घेऊन ते विरघळवून थोडेसे प्या. यामुळे तुम्ही जे काम करणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल.

4. तुम्ही जर कोणत्याही शुभ कामासाठी घराच्या बाहेर जात असाल तर तुम्ही साखरेची पोळी खावी. यामुळे आपले काम मार्गी लागते. साखर नेहमीच शुभ मानली जाते. यामुळेच देवाला गोड म्हणून नेहमीच साखर ठेवली जाते.

संबंधित बातम्या :  Shattila Ekadashi 2022 Date | जाणून घ्या, षटिला एकादशी म्हणजे नक्की काय ? मुहूर्त आणि व्रताची पद्धत

Vastu tips for Sleep | पैशांची कमतरता भासतेय ? , झोपेसंबंधी वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा

(Follow these astrological tips to succeed in life)

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.