AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

vastushashtra: सावधान! तुमचा स्वयंपाकघरातील पाण्याचा भांडेही दक्षिण दिशेला ठेवताय का?

vastu tips: पाण्याचे भांडे अशी वस्तू आहे की ती आपण कुठेही ठेवू शकतो पण जर वास्तुनुसार तेच भांडे योग्य दिशेने ठेवले तर ते घरात समृद्धी, आनंद आणि सौभाग्य आणू शकते आणि जर ते चुकीच्या दिशेने ठेवले तर ते समस्यांना देखील कारणीभूत ठरू शकते.

vastushashtra: सावधान! तुमचा स्वयंपाकघरातील पाण्याचा भांडेही दक्षिण दिशेला ठेवताय का?
Empty potImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Apr 27, 2025 | 7:21 PM

वास्तूशास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे घरातील वास्तूदोष दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढते. वास्तूशास्त्राच्या नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. घरामध्ये योग्य ठिकाणी योग्य वस्तू नसल्यामुळे घरामध्ये वास्तूदोष निर्माण होण्यास मदत होते. वास्तूशास्त्रामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत ज्याचे पालन केल्यामुळे घरातील वास्तूदोष दूक होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व देण्यात आले आहे, वास्तुशास्त्रात प्रत्येक घटकाचे आणि प्रत्येक देवतेचे स्वतःचे स्थान आहे. जर आपण त्या आधारावर आपल्या घरात वस्तूंची जागा ठरवली तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहत राहते.

सामान्यतः असे म्हटले जाते की ज्या घरात नेहमीच अन्न आणि पाण्याने भरलेले असते ते घर पूर्ण असते. म्हणजेच घरात अन्न आणि पाण्याची जागा निश्चित करणे खूप महत्वाचे आहे. वास्तुनुसार, पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा विहित केलेली आहे. जर याची काळजी घेतली नाही तर सकारात्मक उर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते. चला तर मग जाणून घेऊया मटका ठेवण्याची योग्य दिशा कोणती असावी.

वास्तुशास्त्रानुसार, घरातील पाण्याची दिशा ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर किंवा पूर्व असावी कारण ही दिशा पाण्याची देवता वरुण देवाची मानली जाते. ईशान्य कोपरा हा गुरु ग्रहाची दिशा आहे. म्हणूनच उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याचे भांडे ठेवणे शुभ मानले जाते. हे भांडे किंवा घडा ठेवल्याने सुख-समृद्धी येते, मुलांची वाढ होते, घरात वाढ होते, यश मिळते. घरात शांती नांदते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुनुसार, नैऋत्य दिशा ही जमिनीची दिशा आहे, म्हणून त्यात पाणी ठेवू नये. दक्षिण दिशेला भांडे ठेवणे शुभ मानले जात नाही. या ठिकाणी भांडे किंवा घागर ठेवल्याने घरात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दक्षिण दिशेला पाण्याचा भांडे ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो जो घरात नकारात्मकता आणू शकतो.

‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा….

भांडे नेहमी झाकून ठेवावे, प्लास्टिक, स्टील किंवा धातूच्या वस्तूंनी ते झाकू नका.

शक्य असल्यास, ते मलमलच्या कापडाने झाकून ठेवा किंवा मातीच्या झाकणाने झाकून टाका.

जिथे पाणी साठवता ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा. भांडे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा.

भांडे कधीही रिकामे ठेवू नका.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.