AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवारी तुळशीचे पानं का तोडू नये? असे आहे या मागचे कारण

रविवारी तुळशीची पाने (Tulsi Importacne) का तोडता येत नाहीत? एवढेच नाही तर रविवारी पूजा केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करण्यासही मनाई आहे. असे का त्याबद्दल जाणून घेऊया.

रविवारी तुळशीचे पानं का तोडू नये? असे आहे या मागचे कारण
तुळसImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 9:04 AM

मुंबई : तुळस आणि आल्याचा चहा रोज घरी बनवला जातो. मात्र रविवार सुट्टीचा दिवस असूनही अनेक वेळा तुळशीची चव चहामध्ये मिळत नाही. कारण शनिवारी तुम्ही तुळशीची अतिरिक्त पाने तोडून ठेवायला विसरलात आणि आज रविवार आहे त्यामुळे कुटुंबातील कोणीही तुळशीला हात लावू शकत नाही. अशा स्थितीत हा प्रश्न नक्कीच मनात येतो की रविवारी तुळशीची पाने (Tulsi Importance) का तोडता येत नाहीत? एवढेच नाही तर रविवारी पूजा केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करण्यासही मनाई आहे. घरी आई आणि आजी अनेकदा मनाई करतात आणि म्हणतात की आज तुळशीऐवजी दुसऱ्या कुंडीत पाणी टाका. असे का म्हणतात? चला जाणून घेऊया यामागचे कारण

तुळस आणि भारतीय संस्कृती

आजही आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला सर्वात पवित्र वनस्पती मानले जाते. तुळस ही वैद्यकीय वनस्पती आहेच पण धार्मिक दृष्याही तीला विशेष स्थान आहे. हेच कारण आहे की जवळजवळ सर्व हिंदूंच्या घरात तुळशीचे रोप नक्कीच दिसेल.जेव्हा तुळशीचा विचार केला जातो तेव्हा आपण विज्ञानाच्या आधी धार्मिक श्रद्धांचा विचार करतो, कारण आपल्या धार्मिक ग्रंथात तुळशीच्या रोपाचे वर्णन आढळते आणि तुळशीच्या पानांशिवाय कोणतेही पूजा-हवन पूर्ण होत नाही.

पौराणिक कथेनुसार तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे रूप आहे. देवी तुळशी ही भगवान शालिग्रामची पत्नी आहे, भगवान विष्णूचे हे एक रूप आहे. देवी तुळशीला भगवान विष्णूकडून हे वरदान मिळाले आहे की ती जिथे नसेल ती पूजा देव स्वीकारणार नाही. तुळशीच्या या वरदानामुळे प्रत्येक पूजेमध्ये तीची पाने वापरली जातात.

हे सुद्धा वाचा

रविवारी तुळशीची पाने का तोडत नाहीत?

हिंदू धर्मग्रंथांमध्ये, तुळशी ही वनस्पतीपेक्षा देवी तुळशीचे स्वरूप आहे. धार्मिक मान्यतांनुसार, रविवारी देवी तुळशी आणि विष्णू ध्यान आणि विश्रांतीमध्ये मग्न राहतात. तर इतर दिवशी ती आपल्या भक्तांच्या जनहितासाठी आणि कल्याणासाठी उपस्थित असते. रविवारी तुळशीजींचे ध्यान आणि विश्रांतीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तुळशीला जल अर्पण करणे आणि रविवारी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य आहे.

या दिवशीही तुळशीला जल अर्पण केले जात नाही

केवळ रविवारीच नाही तर एकादशीच्या दिवशीही तुळशीला पाणी अर्पण करणे आणि तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते, म्हणजेच तसे करण्यास मनाई आहे. कारण धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. अशा स्थितीत जल अर्पण केल्यास तीचा उपवास मोडतो. त्यामुळे दर रविवारी आणि एकादशीला तुळशीची दुरूनच पूजा केली जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....