Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना पार पडला. अगदी एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताचा 10 विकेट्सनी पराभव झाला.

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ
विनोद कांबळीचं हार्दीकवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 9:33 PM

T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला दारुण पराभूत केलं. अगदी एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताचा 10 विकेट्सनी पराभव झाला. ज्यामध्ये पाकिस्तानने आधी उत्तम गोलंदाजी आणि नंतर क्लासिक फलंदाजी करत विजय मिळवला. या पराभवानंतर सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी कमालीचे निराश झाले आहेत. सोशल मीडियावर तर नुसती टीकांची झुंबड उडाली आहे. विश्वचषकातील सामन्यात पराभव तेही पाकिस्तानकडून आणि तोही दारुण. या साऱ्यामुळे भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावेळी संघ व्यवस्थापनाने अनेक संधी दिल्यानंतरही नापास ठरलेला खेळाडू हार्दीक पंड्यावर (Hardik Pandya) विशेष टीका होत आहेत.

हार्दीकला संघात स्थान देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने अनेक बदल केले. त्याच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजीपासून विश्रांती देत केवळ फलंदाजी करण्याची मुभा दिली. पण त्यातही तो फेल ठरल्याने आता सर्वचजण त्याच्यावर रागवले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने (Vinod Kambli) कू या सोशल मीडिया साईटवर आपली निराशा व्यक्त करत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्याने हार्दीकवर खास टीका करत त्याला थेट दांडीया खेळायचा खोचक सल्ला दिला आहे.

काय म्हणाला विनोद कांबळी?

काबंळीने कू अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे की, “मी कालच्या पराभवानंतर मी अतिशय दु:खी आहे. पाकिस्तानने अगदी ‘ओम भट्ट स्वाहा’ अशी भारताची अवस्था झाली.  मनात खूप प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामध्ये काल काय झाले? नेमकी चूक कुठे झाली? यात मुख्य गुन्हेगार कोण आहे? असे प्रश्न आहेत. तर हार्दीकला मी एवढच सांगेन दुखापत असतानाही तू खेळतो आहेस. अशामध्ये मी एवढच सांगेन पांड्या तू जाऊन खेळ दांडीया”

असा पार पडला सामना

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना

(Formar indian cricketer Vinod kambli slams Hardik for bad performance says go and play dandiya)

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.