AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी तुमच्या संघाला किती विजय आवश्यक? जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेतील 22 सामन्यांचा खेळ संपला आहे. आता पुढच्या टप्प्यात प्लेऑफची शर्यत आणखी तीव्र होणार आहे. दिल्ली वगळता कोणत्याच संघाने सलग विजयाची नोंद केलेली नाही. त्यामुळे आता प्लेऑफच्या शर्यतीत कोणते चार संघ जागा मिळवतील. तसेच कोणत्या संघाला किती विजय हवेत याचं गणित समजून घेऊयात.

IPL 2025 : प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी तुमच्या संघाला किती विजय आवश्यक? जाणून घ्या
आयपीएल 2025 कर्णधार
Follow us
| Updated on: Apr 09, 2025 | 3:51 PM

आयपीएल स्पर्धा आता मधल्या वळणावर आली आहे. मात्र अजूनही कोणत्याच संघाने प्लेऑफवर प्रबळ दावा दाखवला नाही. दिल्ली कॅपिटल्स वगळता प्रत्येक संघाने एखाद दुसरा सामना गमावला आहे. त्यामुळे अजूनही दहा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं गणित कुशी बदलणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत किती सामने शिल्लक आहेत आणि पुढे किती सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल? याचं गणित मांडलं जात आहे. त्यामुळे टॉप चारमध्ये राहण्याची धडपड सुरु झाली आहे. प्लेऑमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला किमान 16 गुण मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्या संघाला किती विजय मिळवणं भाग आहे, यावर गणित अवलंबून आहे. पण स्पर्धेत तुल्यबल सामने सामने झाले तर गणित नेट रनेरटवर अवलंबून असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 3 सामने खेळले असून 6 गुण मिळवले आहेत. अजूनही 11 सामने शिल्लक असून त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला तर 16 गुणांचं गणित सुटेल. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक संधी आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले असून तीन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात 6 गुण पडले आहेत. आता 10 सामने शिल्लक असून 5 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तरच 16 गुणांचं गणित सुटेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सची स्थितीही गुजरात टायटन्ससारखी आहे. या संघांनी चार सामने खेळले असून तीन सामन्यात विजय मिळवला आहे. अजूनही 10 सामने खेळायचे असून पाच सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं गणित सुटणार आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचेही 6 गुण आहेत. पण पाच सामने खेळले आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ पैकी पाच सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या पारड्यात प्रत्येकी 4 गुण पडले आहेत. पण राजस्थान रॉयल्सकडे केकेआरच्या तुलनेत एक सामना अधिकचा आहे. म्हणजेच केकेआरने 5 सामने खेळले असून तीन सामन्यात पराभव तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 4 सामने खेळले असून दोन सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. केकेआरला उर्वरित 9 पैकी 6 सामन्यात, तर राजस्थानला 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांची स्थिती नाजूक आहे. या तिन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या संघांच्या पारड्यात प्रत्येकी 2 गुण आहेत. त्यामुळे या संघांनी 16 गुणांचं गणित सोडवायचं म्हंटलं तर 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे या संघांना आता पुढच्या प्रत्येक सामन्यात करो या मरोची लढाई आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.