AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत त्या सामन्यात फॉलो-ऑनचं संकट कसं टाळलं? आकाशदीपने उघड केलं गुपित

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतासाठी गाबा कसोटी कायम स्मरणात राहिली आहे. ऋषभ पंतची खेळी असो की सध्याच्या दौऱ्यात आकाशदीप आणि जसप्रीत बुमराहची खेळी.. बुमराह-आकाशदीप जोडीने फॉलो-ऑनचं संकट टाळलं होतं. त्या खेळीबाबत आकाशदीपने आता सर्वकाही उघड केलं आहे.

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत त्या सामन्यात फॉलो-ऑनचं संकट कसं टाळलं? आकाशदीपने उघड केलं गुपित
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 3:12 PM

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 असा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी मालिका दहा वर्षांनी आपल्या नावावर केली आहे. या कसोटी मालिकेत एक क्षण असा होता की आरामात मालिका ड्रॉ होईल. पण ऑस्ट्रेलियाने मालिकेचा रोख आपल्याकडे वळवण्यात यश मिळालं. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. आकाशदीप सिंह या कसोटी मालिकेत चमकला. त्याने या मालिकेत पाच गडी बाद केले. आकाशदीपने ब्रिस्बेन कसोटी मालिकेतही चांगली खेळी केली. ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल असा वाटणारा सामना चिवट खेळीने लांबवला. तर मेलबर्न कसोटी सामना भारताच्या हातात होता. पण काही चुका अंगलट आल्या. भारताने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर 6 विकेट अशा स्थितीत आणलं होतं. पण मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला तारलं. जर या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 130 धावांवर रोखलं असतं तर टीम इंडियाने हा सामना जिंकला असा असं मत आकाश दीपने व्यक्त केलं आहे.

आकाशदीपने पीटीआयशी बोलताना बुमराहसोबत केलेल्या खेळीचा उल्लेख केला. त्याने बुमराहसोबत शेवटच्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली होती. ‘त्या दिवशी माझ्या डोक्यात होतं की, कोणत्याही प्रकारची दुखापत सहन करण्यास तयार आहे. पण आऊट होणार नाही. मला धावा करणं गरजेचं होतं. मला कोणत्याही परिस्थितीत दीर्घकाळ फलंदाजी करायची होती. माझ्या डोक्यात फॉलोऑन वाचवणं असं काही नव्हतं. माझ्या डोक्यात दीर्घकाळ फलंदाजी करणं हेच सुरु होतं. आमच्या फलंदाजांना दुसऱ्या डावात तितक्या कमी वेळ फलंदाजी करावी लागेल. त्या दिवशी चेंडू चांगल्या प्रकारे पाहात होतो.’

गाबा कसोटीत आकाश दीपने 31 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या 31 धावांमुळे फॉलोऑनचं संकट टळलं होतं. आकाश दीपने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘ही बॅट विराट कोहलीची होती. यावर एमआरएफ लिहिलं होतं.’ दरम्यान या बॅटबाबत सांगताना आकाशदीप म्हणालाकी, विराट कोहलीकडून मागणं खूपच कठीण काम होतं. पण विराट कोहलीने स्वत:हून बॅट दिली. ‘विराट कोहलीने मला विचारलं बॅट हवी आहे का? मी असंच म्हंटलं हा भैया, तुझी बॅट कोणाला नको असेल. मग काय त्याने बॅट दिली.’

अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....