Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, ‘या’ 5 चुका महाग पडल्या

IND vs ENG T20 WC : टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण हे काम इंग्लंडच्या टीमने केलं.

IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, 'या' 5 चुका महाग पडल्या
Smirti mandhana
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 8:23 AM

IND vs ENG T20 WC : भारताच्या महिला टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या दोन सामन्यात सरस प्रदर्शन केलं. तसाच खेळ टीम इंडियाला शनिवारी दाखवता आला नाही. इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण हे काम इंग्लंडच्या टीमने केलं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्ध हा सहावा पराभव आहे. महिला टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनपर्यंत एकदाही इंग्लंडला हरवता आलेलं नाहीय.

टीम इंडियाकडून दोघी जबरदस्त खेळल्या

इंग्लंडच्या टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. पूर्ण 20 ओव्हर खेळल्यानंतर सात विकेट गमावून त्यांनी 151 धावा केल्या. टीम इंडिया 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावून 140 धावांपर्यंत पोहोचू शकली. टीम इंडियाकडून स्मृती मांधनाने सर्वाधिक 41 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. तिच्याशिवाय ऋचा घोषने 34 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. टीम इंडियाने हा सामना का गमावला? त्याची कारण जाणून घेऊया.

  1. हरमनप्रीतने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 29 धावात तीन विकेट गमावल्या होत्या. पण टीम इंडियाला या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही. मधल्या ओव्हरर्समध्ये टीम इंडियाने धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडची टीम 150 धावांपर्यंत पोहोचू शकली.2
  2. टीम इंडियाच्या फलंदाजांना विकेटवर पाय रोवण्याची गरज होती. पण ते बाद होत गेले. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून स्मृती मांधना आणि ऋचा घोषशिवाय कोणाची चांगली भागीदारी झाली नाही. त्याची किंमत टीमला चुकवावी लागली.
  3. मांधनाने चांगला खेळ दाखवला. तिने अर्धशतक झळकावल होतं. पण ती चुकीच्यावेळी बाद झाली. त्यामुळे टीमच नुकसान झालं. मांधना शेवटपर्यंत टिकली असती, तर निकाल भारताच्या बाजूने लागला असता.4
  4. मांधना आऊट झाल्यानंतर ऋचा घोष एकटी लढली. अन्य खेळाडूंमध्ये विजयाची ती इच्छा दिसली नाही. ऋचाने उशिराने आक्रमक बॅटिंग सुरु केली. ती आधीच आक्रमक क्रिकेट खेळली असती, तर टीम इंडियाचा विजय झाला असता.
  5. क्रिकेटमध्ये मैदानात वेगाने धाव पळणं गरजेच असतं. या मॅचमध्ये टीम इंडियाची हीच कमजोरी दिसली. अनेकदा दोन रन्स काढण्याची संधी होती. पण एकच धाव पळून काढली. हे सुद्धा पराभवाच एक कारण आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.