Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st 20I: भारतीय गोलंदाज बनले मस्करीचा विषय, हे इंटरनॅशनल बॉलर की गल्लीतले क्रिकेटर?

IND vs SA 1st 20I: 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभारतो, तेव्हा त्या टीमचा विजय पक्का मानला जातो. पण त्यासाठी दुसऱ्याबाजूने म्हणजे गोलंदाजांकडून साथ मिळणं, सुद्धा तितकच आवश्यक आहे.

IND vs SA 1st 20I: भारतीय गोलंदाज बनले मस्करीचा विषय, हे इंटरनॅशनल बॉलर की गल्लीतले क्रिकेटर?
Team India Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 12:42 PM

मुंबई: T 20 क्रिकेट हा 120 चेंडूंचा खेळ आहे. टी 20 मध्ये जेव्हा कुठला संघ 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभारतो, तेव्हा त्या टीमचा विजय पक्का मानला जातो. पण त्यासाठी दुसऱ्याबाजूने म्हणजे गोलंदाजांकडून साथ मिळणं, सुद्धा तितकच आवश्यक आहे. अन्यथा गोलंदाजीची बाजू कमकुवत असेल, तर इतकी मोठी धावसंख्या उभारुनही फायदा नसतो. कालच्याच सामन्याचा आपल्याला उद्हारण घेता येईल. 211 धावांचा डोंगर उभा करुनही दक्षिण आफ्रिकेने भारतावर (IND vs SA) अत्यंत सहजतेने मात केली. याच कारण होतं, भारताची कमकुवत गोलंदाजी. डेविड मिलर (David Miller) आणि रासी वॅन डार डुसे यांनी भारताच्या दुबळ्या गोलंदाजीची पुरेपूर फायदा उचलला व खोऱ्याने धावा लुटल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 64 चेंडूत नाबाद 131 धावांची विजयी भागीदारी केली. भारताच्या पराभवाच मुख्य कारण आहे गोलंदाजी. भारतीय गोलंदाजांनी काय चूक केली? ते समजून घ्या.

भारतीय गोलंदाजांनी हद्दच केली

हर्षल पटेल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या या सर्व गोलंदाजांचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर 10 पेक्षा जास्त होता. सर्वच गोलंदाजांनी खराब दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी केली. टेंबा बावुमा आणि क्विंटन डि कॉक आऊट झाल्यानंतर भारतीय गोलंदाजीची दिशा भरकटली. ड्वेन प्रिटोरियसला मध्यमगती गोलंदाज असो किंवा स्पिन गोलंदाज सर्वांनी स्लॉटमध्ये गोलंदाजी केली. म्हणजे भारतीय गोलंदाजी खूपच खराब दर्जाची गोलंदाजी केली. ज्यामुळे मिलर-डुसे जोडीला ते चेंडू सीमापार पोहोचवण्यात कुठलीही अडचण आली नाही.

हे सुद्धा वाचा

भुवनेश्वरचे यॉर्कर चेंडू कुठे गेले?

दक्षिण आफ्रिकेला कालच्या सामन्यात शेवटच्या 10 षटकात विजयासाठी 126 धावांची आवश्यकता होती. सामना खरंतर भारताने जिंकायला पाहिजे होता. पण गोलंदाजी खराब गोलंदाजीत कुठलीही कमतरता ठेवली नाही. हर्षल पटेलने अनेक फुलटॉस चेंडू टाकले. अक्षर पटेलची पण हीच स्थिती होती. युजवेंद्र चहलने सुद्धा सहज फटके खेळता येतील, अशी गोलंदाजी केली. हार्दिक पंड्याच्या एका ओव्हरमध्ये तीन षटकार लगावले. त्यानंतर पंतने त्याच्याकडे चेंडू दिला नाही. भुवनेश्वर कुमार सारख्या अनुभवी गोलंदाजाने यॉर्कर गोलंदाजी केली नाही. ज्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेने उचलला.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.