Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं!

न्यूझीलंड टीम विजयाची हकदार आहे. अंतिम सामन्यात त्यांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन घडवलं. पावसामुळे भारतीय संघाला लय मिळणं मुश्किल झालं होतं, असं विराट म्हणाला. (indian Captain Virat kohli Statement After losing WTC Final 2021)

WTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं!
विराट कोहली (भारतीय कर्णधार)
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 8:25 AM

मुंबई : संपूर्ण क्रिकेट विश्वाला ज्या सामन्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलीय… आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) आठ विकेट्स राखून पराभव केलाय. हा सामना म्हणावा असा रोमांचक झाला नाही… एकतर पहिल्यांदा पावसाने दोन दिवसांचा खेळ वाया गेला आणि नंतर भारतीय फलंदाजांकडून चमकदार कामगिरी बघायला मिळाली नाही. न्यूझीलंडने निर्विवाद वर्चस्व राखलं. परिणामी भारताला पराभवाची चव नाईलाजाने चाखावी लागली. सामना संपल्यानंतर याच गोष्टींना कर्णधार कोहलीने दोषी धरलं. पावसामुळे आम्हाला लय मिळणं मुश्किल झालं, त्यात बॅट्समनकडून म्हणावी अशी कामगिरी झाली नसल्याचं विराट म्हणाला. (Indian Captain Virat kohli Statement After losing WTC Final 2021)

विराट कोहली काय म्हणाला?

“न्यूझीलंड टीम विजयाची हकदार आहे. अंतिम सामन्यात त्यांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन घडवलं. पावसामुळे भारतीय संघाला लय मिळणं मुश्किल झालं होतं. पावसामुळे आम्ही डिस्टर्ब झालो. पावसाने खराब झालेली लय संघाला परत मिळवणं मुश्किल होऊन बसलं”, असं विराट कोहली म्हणाला.

“पावसाने पहिल्या दिवशीचा खेळ वाया गेला आणि खेळ सुरु झाला तर लय पकडणं आम्हाला मुश्किल होऊन बसलं. आम्ही केवळ तीन विकेट गमावल्या पण खेळ जर विनाव्यत्यय सुरु राहिला असता तर आम्ही विकेट न गमावता अधिक रन्स करु शकलो असतो”, असं विराट म्हणाला.

फलंदाजांवर फोडलं खापर

“दुसऱ्या डावांत आम्ही 30 ते 40 धावा अधिक करायला हव्या होत्या. जर आमच्या 30-40 धावा आणखी असत्या तर सामन्याचा निकाल काही वेगळा लागू शकला असता. परंतु भारताचा दुसरा डाव लवकर आटोपला. किवींना विजयासाठी कमी धावांचं टार्गेट मिळालं, त्यांच्या फलंदाजांनी ते टार्गेट पूर्ण केलं”, असंही विराट म्हणाला.

विराटकडून न्यूझीलंडची स्तुती

“न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी शुभेच्छा. तीन ते सव्वा तीन दिवसांत त्यांनी सामना जिंकून दाखवला. त्यांनी भारतीय संघाला दबावात ठेवलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्लॅननुसार गोलंदाजी केली आणि सामना जिंकवून दाखवला. ते जिंकण्याचे नक्कीच हकदार आहेत”, अशा शब्दात न्यूझीलंड संघाची स्तुतीही विराटने केली.

(Indian Captain Virat kohli Statement After losing WTC Final 2021)

हे ही वाचा :

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

WTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…

विराट कोहलीला न्यूझीलंडने नाही हरवलं तर संघातीलच एका खेळाडूने धोका दिला, विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.