IND vs SA Final : कर्णधार रोहित शर्माने अखेर विराट कोहलीबाबत घेतला मोठा निर्णय, “अंतिम सामन्यात…”

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने अखेर इंग्लंडकडून लगान वसूल केला आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताला पराभूत केलं होतं. त्याच्या वेदना होत होत्या. अखेर भारताने उपांत्य फेरीतच पराभूत करून वचपा काढला आहे. असं असताना दुसरीकडे, विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला. त्यावर कर्णधार रोहित शर्माने आपलं मन मोकळं केलं आहे.

IND vs SA Final : कर्णधार रोहित शर्माने अखेर विराट कोहलीबाबत घेतला मोठा निर्णय, अंतिम सामन्यात...
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 2:35 AM

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता जेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला स्टार फलंदाज विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून विराट कोहलीला सूर गवसलेला नाही. त्याचा अनुभव पाहता त्याच्यावर वारंवार विश्वास टाकला जात आहे. मात्र त्या कसोटीवर सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला आहे. आतपर्यंत खेळलेल्या सात सामन्यात विराट कोहलीने एकूण 75 धावा केल्या आहेत. दुसरा कोणता फलंदाज असता तर त्याला रोहित शर्माने कधीच प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं असतं. पण विराटचं महत्त्व त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. त्याचं असणं संघासाठी किती फायदेशीर ठरेल याचा अंदाज आहे. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने याबाबत आपलं मत व्यक्त केलं. तसेच विराट कोहलीची पाठराखण केली असून तो अंतिम सामन्यातही असेल याबाबत सांगितलं आहे.

“विराट कोहली एक क्लास प्लेयर आहे. कोणताही खेळाडूला या प्रसंगातून जावं लागतं. पण त्याचा खेळ आणि त्याचे महत्त्व आम्हाला माहिती आहे. फॉर्म ही समस्या ठरू शकत नाही. त्याचा हेतू स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही फायनलमध्येही त्याच्या पाठीशी आहोत.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. म्हणजेच विराट कोहली अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल यात शंका नाही.

विराट कोहलीने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 1, पाकिस्तानविरुद्ध 4, अमेरिकेविरुद्ध 0, अफगाणिस्तानविरुद्ध 24, बांगलादेशविरुद्ध 37, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0 आणि इंग्लंडविरुद्ध 9 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या फॉर्मची चिंता चाहत्यांना आहे. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या विराटची बॅट मात्र वर्ल्डकपमध्ये शांत आहे. आता अंतिम फेरीत विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले.

Non Stop LIVE Update
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न.
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?.
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा...
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा....
राज्यभरात संततधार सुरूच, कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस, IMD चा अलर्ट काय?
राज्यभरात संततधार सुरूच, कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस, IMD चा अलर्ट काय?.
आतापर्यंत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणारे 'हे' प्रतिभावंत भारतीय कॅप्टन्स
आतापर्यंत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणारे 'हे' प्रतिभावंत भारतीय कॅप्टन्स.
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मोदींनी थेट शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले...
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मोदींनी थेट शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले....
'हा माझा शेवटचा...', T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा
'हा माझा शेवटचा...', T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा.
वर्ल्डकप जिंकलो रे...जय हो...T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरल भारतान नाव
वर्ल्डकप जिंकलो रे...जय हो...T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरल भारतान नाव.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.