Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिल्ली कसोटीत चिरडलं, दिमाखदार विजय

IND vs AUS Test : नागपूरप्रमाणे टीम इंडियाने दुसरी कसोटी तीन दिवसात निकाली काढली. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडे 2-0 अशी आघाडी आहे.

IND vs AUS Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिल्ली कसोटीत चिरडलं, दिमाखदार विजय
ind vs aus test Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 2:15 PM

IND vs AUS 2nd Test : टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. दिल्ली कसोटीत टीम इंडियाने नागपूरप्रमाणे दिमाखदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना 6 विकेटने जिंकला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 115 धावांच लक्ष्य चार विकेट गमावून आरामात पार केलं. नागपूरप्रमाणे टीम इंडियाने दुसरी कसोटी तीन दिवसात निकाली काढली. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडे 2-0 अशी आघाडी आहे. तीन खेळाडूंच्या बळावर टीम इंडियाने दिल्ली कसोटीत वर्चस्व गाजवलं. त्यांच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला अक्षरक्ष: चिरडलं असं म्हणाव लागेल. रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले.

तिसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाने शस्त्र टाकली

ऑस्ट्रेलियन टीम आज थोडी चांगली खेळली असती, तर कदाचित दुसरं चित्र पहायला मिळालं असतं. दुसऱ्यादिवसाचा खेळ संपताना त्यांची कसोटीवर पकड दिसत होती. 1 बाद 61 अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती होती. आज रविवारी तिसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियन टीमने शरणागती पत्करली. त्यांनी 52 धावात 9 विकेट गमावल्या. यात अश्विन आणि जाडेजा जोडीची महत्त्वाची भूमिका होती.

एक रन्सवर गमावले 4 विकेट

आज दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्यादिवशी पहिलं सेशन संपण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला. ऑस्ट्रेलियाने 18.2 ओव्हर्समध्ये 52 धावा देऊन 9 विकेट गमावल्या. यात फक्त एक रन्सवर चार विकेट गमावल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 95 होती. स्वीप शॉट खेळण्याचा मोह कांगारुंना भारी पडला. दुसऱ्याडावात त्यांचे 6 फलंदाज या नादात तंबुत परतले.

पुजाराच्या 100 व्या कसोटी सामन्यात भारताचा विजय

ऑस्ट्रेलियाच्या 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 4 विकेट गमावून विजय मिळवला. यात 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराची भूमिका महत्त्वाची होती. पुजाने एकबाजू लावून धरली. पुजारा शेवटपर्यंत नाबाद राहिला. टीमला त्याने विजय मिळवून दिला. टीम इंडियाचे 3 स्टार

टीम इंडियाच्या या विजयात रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांची भूमिका महत्त्वचाी होती. रविंद्र जाडेजाने दुसऱ्याडावात 7 एकूण मिळून 10 विकेट घेतले. अश्विनने दोन्ही डावात मिळून 6 आणि अक्षर पटेलने पहिल्या डावात टीमला गरज असताना 115 चेंडूत 74 धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. या तिघांनी टीमच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.