बांगलादेशमधील आंदोलनाचा क्रिकेटलाही फटका, ICC घेणार मोठा निर्णय

बांगलादेशमधील परिस्थिती नाजूक आहे. आंदोलनात ३०० हून अधिक लोकं मारली गेली आहे. पंतप्रधानांना पद सोडावे लागले आहेत. इतकंच नाही तर देश देखील सोडावा लागला आहे. आता याचा क्रिकेला ही मोठा फटका बसणार आहे. आयसीसी यावर बारीक नजर ठेवून आहे.

बांगलादेशमधील आंदोलनाचा क्रिकेटलाही फटका, ICC घेणार मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 12:30 AM

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांना देशही सोडावा लागला आहे. आता लष्कराने बांगलादेशची सत्ता काबीज केली आहे. या राजकीय घडामोडीचा परिणाम क्रिकेटवर देखील होणार आहे. त्यामुळे बांगलादेशकडून महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद हिरावून घेतले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी बांगलादेशातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे, परंतु राजकीय परिस्थितीमुळे या स्पर्धेवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. या स्थितीत बांगलादेशच्या भूमीवर टी-20 विश्वचषक आयोजित करणे शक्य नसल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत महिला टी-20 विश्वचषक श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण ICC लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते असे मानले जात आहे.

बांगलादेशच्या इतिहासात लष्कराने सत्ता काबीज करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1975 मध्येही लष्कराने तेथील सत्ता काबीज केली होती. त्यावेळी देशात शेख मुजीबुर रहमान यांचे सरकार होते. शेख मुजीबुर रहमान हे शेख हसीनाचे वडील होते. त्या काळात जेव्हा लष्कराने देशाची सत्ता काबीज केली होती, तेव्हा लष्कराने बांगलादेशवर सुमारे 15 वर्षे राज्य केले.

शेख हसीना यांचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर थांबले आहे. दरम्यान, आज भारतातील पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुमारे दीड तास सीसीएसची बैठक झाली. जिथे परराष्ट्र मंत्री आणि NSA यांनी बांगलादेशातील प्रत्येक परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली आहे. आता शेख हसीनाचे विमान हिंडन एअरबेसवरून कुठे जाणार हे स्पष्ट झालेले नाही.

शेख हसीना यांच्या जाण्याने दक्षिण आशियामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात, विशेषत: चीनचा वाढता प्रभाव आणखी मजबूत होऊ शकतो, जे भारतासाठी मोठे आव्हान आहे. उदाहरणार्थ, चीन तिस्ता सिंचन प्रकल्पावर डोळा ठेवून होता, पण भारताने त्यात सहकार्याचा प्रस्ताव दिल्याने शेख हसीना यांनी आपली धोरणे बदलली.

प्रकल्पाचे स्थान सिलीगुडी कॉरिडॉरच्या जवळ आहे, जे भारतासाठी धोरणात्मक डोकेदुखी आहे. हा कॉरिडॉर चिकन्स नेक म्हणून ओळखला जातो, जो ईशान्येला रस्त्याने जोडण्याचा एकमेव मार्ग आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.