Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : विराटच्या अनुपस्थितीत रहाणेऐवजी रोहितला कर्णधार करा; इरफान पठाणचा सल्ला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे.

IND vs AUS : विराटच्या अनुपस्थितीत रहाणेऐवजी रोहितला कर्णधार करा; इरफान पठाणचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 11:04 PM

दुबई : आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2020) समाप्तीनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia) जाणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडिया टी 20, एकदिवसीय मालिकेनंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे. याबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणने बीसीसीआयला वेगळाच सल्ला दिला आहे.

इरफान पठाण म्हणाला की, कोहलीच्या गैरहजेरीचा भारतीय संघाला मोठा फटका बसू शकतो. विराटची जागा घेणं कोणत्याही खेळाडूसाठी अवघड गोष्ट आहे. गेल्या काही वर्षातील त्याचा परफॉर्मन्स पाहिल्यावर ही बाब सहज लक्षात येईल. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबादारी द्यायला हवी. मी रहाणेला विरोध करत नाही, परंतु रोहितने कर्णधार व्हायला हवं. एक कर्णधार म्हणून रोहितने स्वतःला सिद्ध केलं आहे.

पठाण म्हणाला की, तुम्ही 2008 ची ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय मालिका आठवून पाहा. तेव्हा रोहित संघात नवीन होता. परंतु ऑस्ट्रेलियन मैदानांवर त्याने जबरदस्त खेळ दाखवला होता. रोहित नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे आता तो स्वतःला सिद्ध करु पाहतोय, अशा वेळी त्याला संधी द्यायला हवी.

इरफान म्हणाला की, रोहितची धावांची भूक ही विरोधी संघासाठी धोकादायक बाब आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर खेळणं अवघड असतं. परंतु रोहित जेव्हा फॉर्ममध्ये असतो, तेव्हा त्याला रोखणं हे सर्वात कठीण काम आहे. 2004 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी विरेंद्र सेहवागने भारतीय संघासाठी जी भूमिका निभावली होती, अगदी तशीच भूमिका आत्ता रोहित निभावेल, यात कोणतीही शंका नाही.

कसोटी मालिकेदरम्यान ‘या’ कारणामुळे कर्णधार कोहली मायदेशी परतणार

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट टीम इंडियासाठी तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील दुसरा, तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे 26 डिसेंबर, 7 आणि 15 जानेवारी 2020 ला खेळण्यात येणार आहे. विराटच्या घरी या कालावधी दरम्यान नवीन पाहुणा येणार असल्याने विराटने शेवटच्या 3 कसोटीतून माघार घेतली आहे.

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….

IND vs AUS: एकही सामना न खेळता वरुण चक्रवर्ती भारतीय संघाबाहेर, वरुणच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

(IND vs AUS Test series : Irfan Pathan wants Rohit sharma to captain not Ajinkya rahane in absence of Virat Kohli)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.