AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; ‘या’ खेळाडूंवर फोडलं खापर

आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जसचा 37 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील चेन्नईचा हा पचवा पराभव आहे.

IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर
एम एस धोनी
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 9:04 AM

दुबई : इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) चेन्नई सुपर किंग्जसचा (Chennai Super Kings) 37 धावांनी पराभव केला. बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून अवघ्या 132 धावाच करता आल्या. (IPL 2020 : MS Dhoni slams Batsman of CSK after fifth defeat)

या सामन्यात चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि नारायण जगदीशनचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 42 तर नारायण जगदीशनने 33 धावा केल्या. तसेच या सामन्यात धोनीने पुन्हा निराशा केली. धोनी 10 धावांवर बाद झाला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी चेन्नईच्या रायुडूवगळता एकाही फलंदाजाला डोकं वर काढू दिलं नाही. या सामन्यातील पराभवामुळे चेन्नईचा कर्णधार खूप निराश झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये धोनीने त्याची निराशा व्यक्त केली.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नईचा संघ काल पाचव्यांदा पराभूत झाला. कर्णधार धोनीने संघाच्या या खराब कामगिरीचं खापर चेन्नईच्या फलंदाजांवर फोडलं, तसेच गोलंदाजांच्या कामगिरीबाबत धोनीने निराशा व्यक्त केली. धोनी म्हणाला की, गोलंदाजी करत असताना आम्ही शेवटच्या चार षटकांमध्ये चांगली कामगिरी केली नाही.

फलंदाजांबाबत बोलताना धोनी म्हणाला की, आमच्या फलंदाजांनी चांगला खेळ करण्याची आवश्यकता होती. फलंदाजी आमचा चिंतेचा विषय आहे. आजच्या सामन्यात ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. संघाच्या फलंदाजीबाबत आम्हाला काहीतरी करावं लागणार आहे.

धोनी म्हणाला की, आम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळावं लागणार आहे. आम्ही मोठे फटके मारायला हवे होते, भले आम्ही बाद झालो असतो तरी चाललं असतं. परंतु आम्ही आक्रमकपणे फलंदाजी करायला हवी होती. पुढील सामन्यात आम्ही तसा प्रयत्न करु. सहाव्या षटकानंतर आमच्या फलंदाजांची गती कमी होते. आमचा खेळ पाहताना असं जाणवतं की, आम्ही कोणत्याही रणनीतिसह मैदानात उतरलेलो नाही. आमच्या संघात अनेक कमतरता आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2020 | हिंमत असेल तर माझ्यापेक्षा चांगलं खेळून दाखव, हिटमॅन रोहितचं गब्बर धवनला आव्हान

IPL 2020, KXIP vs KKR : वेगवान अर्धशतकासह कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नावे अनोख्या कामगिरीची नोंद

(IPL 2020 : MS Dhoni slams Batsman of CSK after fifth defeat)

Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.