Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओचा धमाका, 2500 ते 3000 रुपयात जिओ 5 जी स्मार्टफोन लाँच करणार

रिलायन्स जिओ लवकरच आपला 5G स्मार्टफोन 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्याच्या तयारीत आहे (Jio launch new smartphone).

जिओचा धमाका, 2500 ते 3000 रुपयात जिओ 5 जी स्मार्टफोन लाँच करणार
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 10:03 AM

मुंबई : रिलायन्स जिओ लवकरच आपला 5G स्मार्टफोन 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्याच्या तयारीत आहे (Jio launch new smartphone). लाँच केल्यानंतर हळूहळू या स्मार्टफोनची किंमत 2500-3000 रुपये केली जाणार. कंपनी हा फोन विकण्यासाठी 20 ते 25 कोटी मोबाईल फोन युझर्सला टार्गेट करत आहे, जे सध्या 2G फोनचा वापर करत आहेत (Jio launch new smartphone).

मिंटने दिलेल्ला माहितीनुसार एका कंपनीने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जिओ पाच हजार रुपये किमतीचा फोन लाँच करणार आहे. लाँच केल्यानंतर जेव्हा फोनची विक्री वाढेल तेव्हा जिओ या फोनची किंमत 2500 ते 5000 रुपये करुन शकते. रिलायन्सच्या 43 व्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारत 2G मुक्त करण्याची आणि अफोर्डेबल किंमतीत 5जी फोन विकण्याची ईच्छा व्यक्त केली.

गुगलच्या भागीदारीचा फायदा होणार

जिओचा हा फोन लाँच करण्यामध्ये जिओला गुगलच्या भागीदारीचा फायदा होणार. काही महिन्यापूर्वीच गुगलने जिओमध्ये 4.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. गुगलकडून अँड्रॉईड बेस स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यासाठी पार्टनरशिप केली. जिओचा स्वस्त स्मार्टफोन गुगलच्या भागीदारीत लाँच केला जाईल.

या कंपन्यांना मिळणार टक्कर

5 जी स्मार्टफोनची सुरुवात 27 हजार रुपये आहे. आताच्या सर्व मोठ्या कंपन्या शाओमी, रिअलमी, ओप्पो, विवो, अॅपल आणि सॅमसंग 5 जी स्मार्टफोन लाँच करत आहेत. ज्यांची किंमत खूप आहे आणि जिओचा हा कमी किमतीचा 5 जी स्मार्टफोन पूर्ण मार्केट आपल्याकडे खेचून घेऊ शकतो.

जिओ अशी कंपनी आहे की, त्यांनी यापूर्वीही कमी किमतीत 4 जी फोन विकले होते. कंपनीने या फोनसाठी ग्राहकांकडून 1500 रुपये घेतले होते. जे रिफंडेबल होते. ग्राहक कंपनीला फोन देऊन डिपॉझिट केलेले पैसे पुन्हा मिळवू शकतात.

संबंधित बातम्या :

‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Oppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.