विसरा आता 9 ते 5 वेळेतील नोकरी; LinkedIn च्या सह संस्थापकाची अजून एक भविष्यवाणी, यापूर्वीचा एकही अंदाज नाही चुकला

Office Time : चाकरमान्यांसाठी मोठी बातमी आहे. कार्यालयीन वेळ हे अनेकांच्या आयुष्याचा भाग आहे. 9 ते 5 या कार्यालयीन वेळेत अनेकांचे आयुष्य निघून जाते. पण लिंक्डइनचे सह संस्थापक रीड होफमॅन यांनी ही वेळ लवकरच गुंडाळल्या जाईल असा अजब दावा केला आहे.

विसरा आता 9 ते 5 वेळेतील नोकरी; LinkedIn च्या सह संस्थापकाची अजून एक भविष्यवाणी, यापूर्वीचा एकही अंदाज नाही चुकला
कार्यालयीन वेळेवरुन मोठे भारुड
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 2:36 PM

प्रत्येकाची एक वेळ असते, वेळ आल्यावर कळते, वेळ निघून गेल्यावर काही हाशील, वेळेत या, वेळ महत्वाचा असतो, अशा कितीतरी वाक्य प्रचार, म्हणी वेळेची महती सांगतात. चाकरमान्यांसाठी तर 9 ते 5 ही वेळ म्हणजे जणू त्यांची रोजीरोटीच असते. या काळात त्यांना कार्यालयात खपावे लागते. राब राब राबावे लागते. अर्थात सर्वच कर्मचारी वेळेचे बंधन पाळत नाही. पण या वेळेचा एक दबाव असतो. 9 ते 5 या कार्यालयीन वेळेत अनेकांचे आयुष्य निघून जाते. पण लिंक्डइनचे सह संस्थापक रीड होफमॅन यांनी ही वेळ लवकरच गुंडाळल्या जाईल असा अजब दावा केला आहे.

काय आहे दावा

हे सुद्धा वाचा

लिंक्डइनचे सह संस्थापक रीड होफमॅन यांच्या मते AI आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत आहे. येत्या काही वर्षात, स्पष्ट सांगायचे तर 2034 पर्यंत 9 ते 5 या काळातील नोकऱ्या संपुष्टात येतील. कार्यालयीन कामाची वेळ अशी असणार नाही. त्यांचा याविषयीचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. त्यांना पारंपारिक नोकऱ्या आणि तिथली कार्य संस्कृती संपून जाण्याचे भाकीत केले आहे. कंपन्यांनी या तंत्रज्ञानाच्या जगतात नवीन विचार करायला हवा, त्यांनी पारंपारिक गोष्टीत आतापासूनच बदल करायला हवा, अशी वकिली होफमॅन यांनी केली आहे.

नारायण मूर्तींचे एकदम विरुद्ध विचार

कामाच्या तासाविषयी कर्मचाऱ्यांची भूमिका बदलेल असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे मोठी आयटी फर्म इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती आणि इतर उद्योजकांनी कर्नाटक सरकारला कामाचे 14 तास करण्यावर विचार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या दोन टोकाच्या कार्य संस्कृतीच्या कल्पनामध्ये आता मूर्ती खरे ठरणार की होफमॅन हे कळायला आपल्याला किमान दहा वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे.

हे भाकीत ठरले होते खरे

नील तापरिया यांनी रीड होफमॅन यांची पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी यापूर्वी होफमॅन यांच्या तीन भविष्यवाण्यांचा उल्लेख केला आहे. यापूर्वीचे भाकीत खरं ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

1.त्यांनी 1997 मध्ये सोशल मीडिया हा जगावर राज्य करेल. समाजात समाज माध्यमांचे पर्व येईल ही भविष्यवाणी केली होती. त्याकाळी समाज माध्यमांचा नुकताच जन्म होत होता. तर फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम वा इतर सोशल मीडियाचा जन्म सुद्धा झाला नव्हता.

2.जगातील साधनांचा वापर करुन लोक नवीन अर्थव्यवस्था उभारतील. जे उत्पादन करणार नाहीत, ते व्यवसाय करतील ही त्यांची भविष्यवाणी पण खरी ठरली आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टपासून अनेक कंपन्या आपल्यासमोर आहेत. तर अनेक युनिकॉर्न आणि स्टार्टअप्स आपल्यासमोर आहेत.

3. तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स जगभरात मोठी क्रांती आणणार असल्याचे त्यांनी कित्येक वर्षे अगोदर सांगितले होते. त्यावेळी एआयचा उल्लेख सुद्धा जगात होत नव्हता.

Non Stop LIVE Update
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?.
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.