Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Couple: कोल्हापूरचं जोडपं म्हणे,”जोपर्यंत पाण्याची समस्या दूर होत नाही, हनिमूनला जाणार नाही!”

Kolhapur Viral Wedding: लग्नसराईसाठी गाडीऐवजी पाण्याच्या टँकरचा वापर केला आणि वाहनावर लटकवलेल्या बॅनरवरील संदेशात पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे जोडपे हनिमूनला जाणार नाही, असं नमूद करण्यात आलं.

Kolhapur Couple: कोल्हापूरचं जोडपं म्हणे,जोपर्यंत पाण्याची समस्या दूर होत नाही, हनिमूनला जाणार नाही!
Kolhapur Honeymoon Water TankerImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 4:06 PM

कोल्हापुरातील जोडप्याचं लग्न (Kolhapur Couple) झालं आणि ते लग्न प्रचंड गाजलं! कारणही तसंच आहे. त्यांनी जोपर्यंत आमच्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनीमूनला (Honeymoon) जाणार नाही असं म्हटलंय. नवरदेव विशाल कोळेकर याचे गुरुवारी लग्न झाले आणि या जोडप्याने आपल्या परिसरातील पाण्याची समस्या मांडण्यासाठी पाण्याच्या टँकरवर लग्नाची मिरवणूक काढली. कोळेकर आणि त्यांची पत्नी अपर्णा यांनी लग्नसराईसाठी गाडीऐवजी पाण्याच्या टँकरचा (Water Tanker) वापर केला आणि वाहनावर लटकवलेल्या बॅनरवरील संदेशात पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे जोडपे हनिमूनला जाणार नाही, असं नमूद करण्यात आलं.

समस्या अधोरेखित करण्यासाठी हनिमूनला न जाण्याचा निर्णय

कोल्हापूर शहरातील खासबाग-मिरजकर तिकटी परिसरातील पाणी पुरवठ्याची समस्या पूर्ववत होत नाही, तोपर्यंत हनीमूनला न जाण्याचा पवित्रा विशाल कोळेकर आणि त्यांची पत्नी अपर्णा साळुंखे यांनी घेतला आहे. त्यांचा अनोखा विरोध चांगलाच व्हयरल होतोय. शुक्रवारी मुख्य हायड्रॉलिक इंजिनीअर हर्षजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने या परिसराला भेट दिली. अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या तपासल्या आणि तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विशाल म्हणाले, ‘अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या गेल्या सहा महिन्यांपासून भेडसावत आहे. आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केली होती, पण हा प्रश्न सुटलेला नाही.” ते म्हणाले की, पाण्याचा दाब कमी असल्याची तक्रार करणारे अनेक कॉल रहिवाशांनी केल्यानंतरच त्यांच्या घरी पाणीपुरवठा केला जातो. “ही समस्या अधोरेखित करण्यासाठी हनिमूनला न जाण्याचा निर्णय आमच्याकडे आहे. आम्हाला आशा आहे की हा प्रश्न लवकरच सुटेल.”

हे सुद्धा वाचा

टँकरच्या वाहनावर बसून लग्नाच्या ठिकाणी पोहोचले

विशाल आणि अपर्णा, त्यांच्या लग्नाच्या वेषात, टँकरच्या वाहनावर बसून त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचले. नातेवाइकांनी रिकामी भांडी डोक्यावर घेतली आणि वाहनासमोरून चालत गेले. तसेच ‘लेझीम’चे पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. लग्नाची वरात नवरदेवाच्या घरी आल्यानंतर टँकरमधले पाणी टाक्या भरण्यासाठी वापरले. या अनोख्या मिरवणुकीचे आयोजक कार्यकर्ते आणि एक रमेश मोरे म्हणाले, ‘आम्ही विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी अनोख्या पद्धतीने 40 हून अधिक निदर्शनं केली आहेत. हे पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी होते. आम्हाला पंचगंगा नदीचे वरदान लाभले आहे, आमच्याकडे पुरेसा पाऊस पडतो, असे असूनही शहरातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा संबंध केएमसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या निकृष्ट व्यवस्थापनाशी आहे.” या प्रकरणानंतर लग्नाच्या मिरवणुकीनंतर केएमसी अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.