AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway : अवघ्या 3 किलोमीटरचे अंतर, लागतात केवळ 9 मिनिटं, भाडे मात्र 1255 रुपये

Indian Railway : राज्यातील या दोन रेल्वे स्टेशनमधील अंतर केवळ 3 किलोमीटर आहे. पण त्यासाठी या प्रवाशांना 1255 रुपये भाडे मोजावे लागते.

Indian Railway : अवघ्या 3 किलोमीटरचे अंतर, लागतात केवळ 9 मिनिटं, भाडे मात्र 1255 रुपये
ऐकावं ते नवलंच
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 6:42 PM

नवी दिल्ली : भारतात रेल्वेचा (Indian Railway) प्रवास सर्वात सोयीस्कर आणि स्वस्त म्हणून ओळखल्या जातो. दररोज लाखो प्रवासी एका स्थानकाहून दुसऱ्या स्टेशनवर प्रवास करतात. भाडे पण जास्त नसल्याने दूरच्या प्रवाशासाठी रेल्वेलाच अगोदर पसंती देण्यात येते. पण देशातील या छोट्या रेल्वे ट्रॅकने मात्र या स्वस्त प्रवाशाच्या संकल्पनेला छेद दिला आहे. हे दोन्ही रेल्वे स्टेशन महाराष्ट्रातील आहेत. या छोट्या रेल्वे रुटचे (Shortest Indian Rail Route) अंतर अवघे 3 किलोमीटर आहे. साधारणपणे 9-10 मिनिटांत हा प्रवास पूर्ण होतो. पण भाडं म्हणाल तर तु्म्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. 300 किलोमीटर अंतरासाठी जेवढे भाडं द्यावे लागेल, तेवढेच भाड्या या 3 किलोमीटरसाठी मोजावे लागते.

3 किलोमीटरसाठी मोजा 1255 रुपये तर हा सर्वात छोटा रेल्वे रूट नागपूर ते अजनी (Nagpur to Ajni Railway Station) या दरम्यान आहे. दोन्ही रेल्वे स्टेशनमध्ये अवघे 3 किलोमीटरचे अंतर आहे. हा देशातील सर्वात छोटा रेल्वे मार्ग आहे. पण या दोन रेल्वे स्टेशनसाठी उच्च श्रेणीचे तिकीट ऐकून तुम्ही अचंबित व्हाल. या तीन किलोमीटरसाठी प्रवाशांना1255 रुपये मोजावे लागतात.

किती आहे तिकिट ऑनलाईन ट्रेन तिकिट बुकिंग संकेतस्थळ Goibibo नुसार, नागपूर ते अजनी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान स्लीपर क्लासचे भाडे 175 रुपये आहे. जनरल तिकिट मात्र अवघे 60 रुपयांच्या जवळपास आहे. पण या दरम्यान फर्स्ट क्लास एसीचे तिकिट जर एखाद्याने बुक केले तर अवघ्या 3 किलोमीटरसाठी त्याला 1255 रुपये द्यावे लागतील. आता कोण प्रवाशी पायावर धोंडा पाडून घेईल नाही का?

हे सुद्धा वाचा

दिल्ली ते जयपूर इतके भाडे जर तुम्ही शालीमार एक्सप्रेसने दिल्ली ते जयपूर हे अंतर फर्स्ट एसीतून कराल तर तुम्हाला 1190 रुपये खर्च करावा लागेल. Goibibo नुसार, नागपूर ते अजनी या स्टेशन दरम्यान केवळ 3 किलोमीटरचा प्रवास विदर्भ एक्सप्रेसने कराल तर तुम्हाला जयपूर-दिल्लीपेक्षा जास्त 1255 रुपये खर्च करावे लागतील. तर विदर्भ एक्सप्रेसने नागपूर ते अजनी या दरम्यान थर्ड एसीचे भाडे 555 रुपये, सेंकड एसीचे भाडे 760 रुपये आहे. स्लीपर क्लाससाठी तुम्हाला 175 रुपये द्यावे लागतील.

तीन किलोमीटरसाठी खिशा कापणार नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसने तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला स्लीपर क्लाससाठी 175, थर्ड एसीसाठी 555 रुपये, सेंकड एसीसाठी 760 रुपये किराया द्यावा लागेल. महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर-अजनी दरम्यान प्रवास करत असाल तर स्लीपरसाठी 145 रुपये, थर्ड एसीसाठी 505 रुपये आणि सेंकड एसीसाठी 710 रुपये खर्च करावे लागतील.

सर्वात दूर प्रवास करणारी रेल्वे देशात सर्वात जास्त आंतर कापणारी रेल्वे विवेक एक्सप्रेस आहे. स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त या ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून ते आसाममधील डिब्रुगढपर्यंत ही ट्रेन धावते. ही ट्रेन जवळपास 4300 किलोमीटरचे अंतर कापते.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.