AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य विमा कंपन्यांच्या फसवणुकीवर जालीम इलाज, हक्कांविषयी रहा जागरूक, बिनधास्त करा कंपन्यांच्या दाव्याची चिरफाड

आरोग्य विमा कंपन्यांकडून फसवणुकीचे प्रकार अशात अधिक वाढल्याने या कंपन्यांचे पितळ उघडे पाडा. त्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी ग्राहकांच्या हातीही मोठे शस्त्र आहे.

आरोग्य विमा कंपन्यांच्या फसवणुकीवर जालीम इलाज, हक्कांविषयी रहा जागरूक, बिनधास्त करा कंपन्यांच्या दाव्याची चिरफाड
Health Insurance
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 7:57 AM
Share

अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक संकटात आरोग्य विमा आर्थिक विवंचनेत भर न घालता त्यातून आपली लागलीच सुटका करतो. त्यामुळे आरोग्य विम्याचे सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्व अधोरेखित झाले आहे. सर्वसामान्य ग्राहकही आरोग्य विम्याकडे वळले आहेत. असे असले तरी या विमा प्रकारात फसवणुकीचीे प्रमाण (Health Insurance Fraud) ही वाढले आहे. खोट्या जाहिराती, खोटी आश्वासने देऊन ग्राहकांच्या माथी विमा मारायचा आणि निकडीच्या काळात  नियमांचा बागुलबुवा दाखवत अल्प क्लेमवरती त्यांची बोळवण करण्याचा धंदा सध्या राजरोजसपणे सुरु आहे. याविषयीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) अशा कंपन्यांवर अंकुश लावण्याची मोहिम सुरु केली आहे. आरोग्य विमामध्ये फसवणुकीचे दोन प्रकार पहायला मिळतात. एक म्हणजे कंपनीने फसविलेले तर दुसरे म्हणजे ग्राहकांनी चुकीची माहिती देऊन फसविलेले. तर ग्राहकांची फसवणूक केलेल्या प्रकाराची आपण माहिती घेऊ.

तक्रार कुठं करायची?

तुम्ही आरोग्य विमा कंपनीच्या सेवेबाबत असमाधानी आहात आणि कंपनीने केलेल्या फसवणुकीचे प्रमाण, सज्जड पुरावे तुमच्याकडे असतील तर तुम्ही थेट IRDAI कडे तक्रार नोंदवू शकता.  IRDAI ग्राहकांच्या हितासाठी प्रयत्नरत आहे. त्याचे नियमही त्याच अनुषंगाने तयार करण्यात आले आहे. तक्रार केल्यानंतर संबंधित कंपनीला मर्यादीत कालावधीत या तक्रारीचा निपटारा करावा लागतो.

तक्रार करण्याचा कालावधी?

विमा कंपनीच्या सेवेतील त्रुटीविषयी तुम्हाला कंपनीला ही कळवावे लागते. त्यांच्या सेवेतील कमी लक्षात आणून द्यावी लागते. कंपनीला 15 दिवसांत तुमच्या तक्रारीचा आढावा घेऊन समाधानकारक उत्तर द्यावे लागते.  विमा कंपनीने मर्यादीत कालावधीत तुमच्या तक्रारीला प्रतिसाद दिला नाही अथवा समाधानकारक उत्तर दिले नाही तर ग्राहकाला  IRDAI कडे तक्रार नोंदविता येते.

कोणती ही आरोग्य विषयक योजना खरेदी करताना डोळे झाकून ती खरेदी करु नका, खोटी अश्वासने, जाहिरातीतील भूलथापांना बळी पडू नका. विमा कर्मचा-याला यासंबंधीची लिखित माहिती मागा. अटी व शर्तींची माहिती समजून घ्या. नंतरच त्यांचा विमा खरेदी करा. त्यातील बारकावे आणि शब्द छल समजून घ्या.  ग्राहकांना Complaints@irdai.gov.in या ई-मेल आयडीवर त्यांची तक्रार नोंदविता येईल.  येथे ही समाधान न झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य ग्राहक आयोग, केंद्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रारीचा पाढा वाचता येईल. फसवणुकी विरोधात दाद मागता येईल.

इतर बातम्या:

चांगल्या बँकिंगसाठी Bad Bank :  कर्ज वसुलीसाठी नवीन प्रयोग, बँकेची बॅलन्सशीटही सुधारणार

Share Market | गुंतवा बिनधास्त, चांगला परतावा हमखास, या शेअरमधून मिळतील तुम्हाला घसघशीत परतावा

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.