AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

September Alert | 1 सप्टेंबरपासून बदलाचे वारे, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम

September Alert | 1 सप्टेंबरपासून या क्षेत्रात बदलाचे वारे आहेत. पीएम किसान योजनेसंबंधीतील कामे करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. नाहीतर तुमची रक्कम अडकू शकते. तर गॅस दरवाढीचा निर्णय प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला होतो.

September Alert | 1 सप्टेंबरपासून बदलाचे वारे, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम
हे होतील बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:19 PM

September Alert | अवघ्या दोन दिवसानंतर नवीन महिन्याची अर्थात सप्टेंबर महिन्याची (September Month) सुरुवात होत आहे. ‘खुश है जमाना आज पहिली तारीख है’, असं आपण कित्येकदा ऐकतो, तर पगारदार(Salaried), शेतकरी (Farmer) आणि सर्वसामान्यांच्या (Common Man) आयुष्यात 1 सप्टेंबरपासून कही खुशी कही गमचे वातावरण राहिल. घरगुती गॅसच्या दरवाढीचा निर्णय प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घेण्यात येतो. काही बँकांचे नियम (Banking Rules) बदलणार आहेत. पीएम किसान योजनेतील (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांसाठी तर उद्याचा दिवस महत्वाचा आहे. योजनेसंबंधीतील कामे करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. नाहीतर तुमची रक्कम अडकू शकते.  एवढेच नाहीतर सप्टेंबर महिन्यांत सणांमुळे काही दिवस बँका बंद राहणार आहेत. याकाळात तुम्ही बँकेसंबधीचे कामकाज करु शकणार नाही.  त्यामुळे तुमच्याशी संबंधीत काही क्षेत्रात बदल होत असेल तर तो लक्षात घ्या आणि ते काम त्वरीत उरकून घ्या.

PNB KYC Updates

पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी केवायसी (Know Your Customers) अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने यासंबंधीचे कडक धोरण यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार, ग्राहकांना पुरेसा अवधी देण्यात आला आहे. 31 ऑगस्टपूर्वी ग्राहकांनी त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. बँकेने ट्विट करुन याविषयीची सूचना ग्राहकांना दिली आहे. तसेच ग्राहकांना एसएमएसही पाठवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येईल. केवायसी अद्ययावत न करणाऱ्या ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर खात्यातील व्यवहार करता येणार नाही.

घरगुती गॅसेच्या किंमती

दर महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या घरगुती गॅसच्या किंमतीत बदल करतात. सातत्याने दरवाढ सुरु असल्याने घरगुती गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांच्या खिश्याला फटका बसू शकतो. तुमचा गॅस संपण्याच्या तयारीत असेल तर आजच जून्या दराने गॅस बुकींग करा.

हे सुद्धा वाचा

पीएम किसान योजना

प्रधानमंत्री किसान योजनेत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 निश्चित केली आहे. जर 31 ऑगस्टपर्यंत या अटीची पूर्तता केली नाही तर शेतकऱ्यांची पुढील हप्ता अटकू शकतो.

विमा एजंटचे कमीशन कमी

IRDAI ने जनरल इन्शुरन्समधील नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार, एजंटच्या कमीशनमध्ये कपात करण्यात आली आहे. आता 30 ते 35 टक्क्यांऐवजी एजंटला 20 टक्के कमिशन मिळणार आहे. परिणामी ग्राहकांना आता विमा स्वस्त मिळेल आणि या व्यवसायाची व्याप्ती ही वाढेल.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.