शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही तर… , केंद्रीय मंत्र्यानं व्यक्त केला विश्वास
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही तर मजबुतीने महाराष्ट्राचा विकास होणार, काय म्हणाले अनुराग ठाकूर?
ठाणे : विरोधी पक्ष कायमच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, असे मत व्यक्त करत आहेत, यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ते नुसतीच आशा धरून बसलेले आहेत. महाराष्ट्रात डबल इंजिनची ताकद आणखी वाढेल, सरकार जाणार असल्याची आशा असलेल्यांना निराशा पत्करावी लागेल, असा टोलाही ठाकुर यांनी लगावला. विशेष म्हणजे हे सरकार कोसळणार नाही तर अधिक मजबुतीने महाराष्ट्राचा विकास करणार आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. देशातील ईशान्येकडील राज्यांबरोबरच तमिळनाडूतूनही भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वासही अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला. अनुराग ठाकूर हे भाजप पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'

पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!

सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक

काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
