AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | रश्मी ठाकरेंबाबत केलेल्या ट्वीट प्रकरणावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया

Mumbai | रश्मी ठाकरेंबाबत केलेल्या ट्वीट प्रकरणावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jan 06, 2022 | 4:08 PM

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीचा आयटी सेल हा एक कारखाना आहे, जेथून लोकांना ट्रोल केलं जातं, एखाद्याला आयुष्यातून उठवलं जातं, अपमानित केलं जातं. त्यांना महाराष्ट्रात सध्या काही काम नाही, त्यामुळे हे लोक या कारखान्यांमध्ये ट्रेनिंग देतात. भाजपने 25 हजार रुपये पगारावर गजारियासारखी माणसं कामाला ठेवली आहेत केवळ ट्रोलिंगसाठी.

रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात घेण्यात आला आहे. जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या अधिवेशनातही रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चंद्रकांत पाटील यांनी कोपरखिळ्या मारल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीचा मुद्दा गेल्या अधिवेशनात खूपच चर्चेत राहिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असे सल्ले देताना दिसून आले, तर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांना मुलावर विश्वास नसेल तर त्यांनी रश्मी वहिनींना चार्ज द्यावा, अशा कोपरखिळ्या मारताना दिसून आले, त्यानंतर आता हेच प्रकरण राजकारण तापवताना दिसतंय. जितेन गजारिया ने मराठी राबडी देवी असे ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरून सातत्याने भाजपकडून टीका केली जात आहे. या ट्विटवरून शिवसेनेच्या महिला नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. भाजप असे कारखाने चालवते, अशी माणसं भाजपने पगार देऊन ठेवली आहेत, अशी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. रश्मी ठाकरे कुणाच्या आध्यात ना मध्यात असतात, मात्र त्यांच्यावर अशी टीका होणे निंदनीय आहे, अशा भावना आता शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

दरम्यान, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीचा आयटी सेल हा एक कारखाना आहे, जेथून लोकांना ट्रोल केलं जातं, एखाद्याला आयुष्यातून उठवलं जातं, अपमानित केलं जातं. त्यांना महाराष्ट्रात सध्या काही काम नाही, त्यामुळे हे लोक या कारखान्यांमध्ये ट्रेनिंग देतात. भाजपने 25 हजार रुपये पगारावर गजारियासारखी माणसं कामाला ठेवली आहेत केवळ ट्रोलिंगसाठी.

Published on: Jan 06, 2022 03:36 PM