‘वाघनखं येणार कळताच नकली वाघ बिथरले’, भाजप नेत्याचा रोख नेमका कुणावर?

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखे याविषयी सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे, ब्रिटनवरून भारतात आणण्यात येणारी वाघनखं खरी आहे की खोटी? ती वाघनखं खरचं शिवरायांनी वापरली आहेत का? असा सवाल विरोधकांकडून होत असताना भाजप नेत्यानं कुणाला फटकारलं?

'वाघनखं येणार कळताच नकली वाघ बिथरले', भाजप नेत्याचा रोख नेमका कुणावर?
| Updated on: Oct 02, 2023 | 11:10 AM

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखं भारतात परत येत असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवरायांनी वापरलेली वाघनखं लंडनहून १६ नोव्हेंबर रोजी भारतात परत आणण्यात येणार आहे. शिवरायांची वाघनखं ही तीन वर्ष भारतात असणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखे याविषयी सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपावर होताना दिसत आहे. तर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला थेट सवाल करत स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणाले, राज्यात आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत राज्य सरकारने स्पष्टता करावी, या संदर्भातील माहिती राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. ती वाघनखं खरंच शिवरायांची आहे का? विरोधकांकडून होणाऱ्या अशा शंकावर भाजपचे नेते आशिष शेलार प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. ‘वाघनखे येणार कळताच नकली वाघ बिथरले’, असे म्हणत राऊत यांच्यासह ठाकरे गटावर शेलार यांनी टीका केली आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.