Shirdi मध्ये नाईट कर्फ्यू मागे घेतल्याने काकड आरतीला भाविकांची गर्दी
भाविकांच्या गर्दीने दर्शनरांगा फुलून गेल्या आहेत.बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत. उन्हाचा पारा चढत असल्याने साईबाबा संस्थानने उन्हापासुन भाविकांचा बचाव व्हावा याकरिता मंडप आणि पायांना चटके बसु नये यासाठी कारपेटचे आच्छादन टाकले आहेत.
शिर्डी : कोविड रुग्णांची संख्या घटल्याने अहमदनगर जिल्हयात कोविडची नियमावली शिथील करण्यात आलीय. नाईट कर्फ्यूचा निर्णय मागे घेतल्याने भाविकांना आता रात्रीच्या शेजारतीत आणि पहाटच्या काकड आरतीत उपस्थित राहाता येणार आहे. तर निर्बंध हटवल्याने शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. भाविकांच्या गर्दीने दर्शनरांगा फुलून गेल्या आहेत.बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत. उन्हाचा पारा चढत असल्याने साईबाबा संस्थानने उन्हापासुन भाविकांचा बचाव व्हावा याकरिता मंडप आणि पायांना चटके बसु नये यासाठी कारपेटचे आच्छादन टाकले आहेत. यंदाचा रामनवमी उत्सव देखील पारंपरिक पद्धतीने साजरा होणार असुन पायी पालख्या आणण्यास साईबाबा संस्थानने परवानगी दर्शवलीय…दर गुरूवारची साईपालखी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्यानं याबाबत ही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
