मूल रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही, गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
गेल्या 50 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मोठा संघर्ष समाजाचा सुरू असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तर धनगर समाजाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहेत. लोक आस लावून बसले आहेत योग्य तो निर्णय घ्यावा, असेही पडळकर म्हणाले.
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : गेल्या 50 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मोठा संघर्ष समाजाचा सुरू असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तर मूल रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही, अशा ग्रामीण भागातील म्हणीचा दाखला देत धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच्या भावना सरकारकडे पोहोचवण्याचं काम करत आहोत. सरकार आल्यापासून सातत्याने हे आंदोलनं सुरू असे गोपीचंद पडळकर म्हणाले. इतकंच नाहीतर सरकार यामधून नक्कीच चांगला मार्ग काढेल असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला आहे. तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय पूर्णतः वेगळा आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा, अशी वेगळी मागणी करत नाही तर या प्रवर्गात आधीपासूनच धनगर समाज आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी पडळकर यांनी मागणी केली आहे.

राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
