AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी आत्महत्या; अजित दादांचा गंभीर आरोप, म्हणाले हे सरकार आल्यापासून….

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज सकाळपासूनच दौऱ्यावर निघाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय.

शेतकरी आत्महत्या; अजित दादांचा गंभीर आरोप, म्हणाले हे सरकार आल्यापासून....
अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 2:21 PM

पुणेः शेतकरी आत्महत्यांवरून अजित पवार यांनी गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार आल्यापासून रोज शेतकरी आत्महत्या घडतायत. दोज 3 ते 4 शेतकरी आत्महत्या होतात, असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय. या वर्षी राज्यात भरपूर पाऊस होऊनदेखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडे आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय उरतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज सकाळपासूनच दौऱ्यावर निघाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय.

अजित पवार म्हणाले, ‘ एवढा पाऊस पडूनही आत्महत्या करतायत. कारण काय तर त्यांना नुकसान भरपाई मिळत नाहीये. काहींचं खरीपाचं पिक गेलं, नंतर रब्बी गेलं. इतरही विविध पिकं, मका वगैरे गेली. ही अवस्था आहे.

अजित पवार यांनी आज सकाळीदेखील माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर टीका केली. शिंदे गटाने झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा राबवला, असा आरोप केलाय.

यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, या टीकेला काही अर्थ नाही. कारण त्या वेळेला एकनाथ शिंदे माझ्या उजव्या बाजूला बसायचे. तेव्हा ते काही असं म्हणाले नाहीत. आता फक्त राजकीय टीका करायची म्हणून हे वक्तव्य आलंय.

एकूणच ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करणं अजित पवारांना टाळलं. हा शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा विषय आहे.

पण दसऱ्यासारखा महत्त्वाचा सण असतानाही महाराष्ट्रानं ही भाषण ऐकली. कारण दोन नेते काय बोलतात, याचं सर्वांनाच कुतूहल होतं.

दोन्हीकडे गर्दी जमली. पण ती कशी होती, कुठून आली होती, हेही सर्वांनी पाहिलं. मीसुद्धा माध्यमांवर हे पाहिल्याचं अजित पवार म्हणाले.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.