राज्यात आंदोलनाला हिंसक वळण, किती जणांवर गुन्हे तर किती जणांना अटक? पोलीस महासंचालकांची महत्त्वाची माहिती

मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा विरोधकांकडून आरोप .अशातच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर काय-काय कारवाई झाली याची माहिती दिली.

राज्यात आंदोलनाला हिंसक वळण, किती जणांवर गुन्हे तर किती जणांना अटक? पोलीस महासंचालकांची महत्त्वाची माहिती
| Updated on: Nov 01, 2023 | 6:01 PM

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होतोय. अशातच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर काय-काय कारवाई झाली याची माहिती दिली. राज्यात मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी शांततेत आंदोलनं झाली तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. या हिंसक आंदोलनामुळे संभाजी नगरमध्ये ५४ गुन्हे आणि १०६ आरोपी अटकेत आहेत तर बीडमध्ये जमावबंदीचे आदेश दिलेत. बीडमध्ये २० गुन्हे दाखल झाले असून यामध्ये ३०७ आयपीसीनुसार ७ गुन्हे दाखल झालेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १४१ गुन्हे दाखल असून १६८ अटक आरोपी आहेत तर १४६ आरोपींना ४१ अ नुसार नोटीस पाठवण्यात आलीये. या आंदोलनामुळे राज्यात १२ कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान झालंय. तर बीडमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीये. तसेच बीड, संभाजी नगर ग्रामीण आणि जालन्यात इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.