“मुख्यमंत्री मला दिलेला शब्द पाळतील”, मंत्रिमंडळ विस्तारावर प्रताप सरनाईक यांचं सूचक विधान
लवकरच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अनेक इच्छुकांनी आपली मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशात, शिवसेनेतील नेते प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक विधान केलं आहे.
मुंबई : लवकरच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अनेक इच्छुकांनी आपली मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशात, शिवसेनेतील नेते प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक विधान केलं आहे. “एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्याप्रकारे हे सरकार काम करत आहे. 24 तास काम करणारे मुख्यमंत्री, ठाणेकर म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जगभर गाजतंय. जरी मंत्रिमंडळाचा विस्तार लाभला, तरी इतर मंत्र्यांमुळे राज्याच्या सुरळीत कारभार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीही झालं तरी एखाद्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे मला दिलेला शब्द ते नक्कीच पाळतील”, असं प्रताप सरनाईक म्हणाले. “तसेच लवकरच ते दिलेला शब्द पाळून मंत्रिमंडळ विस्तार करतील याबाबत आमच्या मनात काळजीचे कारण नाही”, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
