Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा यांनी जो शाल जोडीतला आहेर दिला तो योग्यच; शिवतारे याची टीका

अजितदादा यांनी जो शाल जोडीतला आहेर दिला तो योग्यच; शिवतारे याची टीका

| Updated on: Apr 01, 2023 | 3:49 PM

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सर्व पक्षांना चांगलेच झापलं आहे. तसेच त्यांनी गिरीश बापट गेले हे सर्वांसाठी वेदना देणारे आहे असं म्हटलं आहे

मुंबई : पुण्याचे खासदार गिरिष बापट यांचे निधन झाल्यानंतर त्याजागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी दावा केला. इतकेच काय तर भाजप पुणे शहराध्यक्षांचे तर भावी खासदार असे पोस्टर लागले. यादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे कान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टोचताना जरा थांबा जनाची नाही तर मनाची तरि बाळगा असा सल्ला दिला होता. याचमुद्द्यावरून माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सर्व पक्षांना चांगलेच झापलं आहे. तसेच त्यांनी गिरीश बापट गेले हे सर्वांसाठी वेदना देणारे आहे. याबाबत जर भाजपने दावा केला असेलतर ती जागा भाजपचीच होती. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण करू पाहताय ते मानवतेला शोभणारे वर्तन नाहीये. अजित पवार यांनी जे शाल जोडीतले आणि घरचा आहेर या लोकांना दिला आहे तो अगदी योग्य असल्याचे शिवतारे यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 01, 2023 03:49 PM