‘सरकारच्या दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..’, दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा

शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून ट्वीटवर ट्वीट करून सरकारला धारेवर धरताना दिसताय. अशातच रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारच्या दावोस दौऱ्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

'सरकारच्या दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..', दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
| Updated on: Oct 04, 2024 | 6:12 PM

‘दावोसमध्ये जाऊन सरकार खाऊन पिऊन आलं आणि बिलं उधार ठेवून आलं’, अशा शब्दात शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तर आंतरराष्ट्रीय मंचावर राज्याची बदनामी होऊ शकते असेही रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी ट्विट करून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले पण बिलं उधार ठेवून आलेत, आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे’, असे रोहित पवार म्हणाले. तर महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या दावोस समिट सारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे उदय सामंत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबंधित यंत्रणेला हा विषय निकाली काढण्याचे आदेश द्यावेत, असे म्हणत खोचक टोला लगावत रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.

Follow us
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.