AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी चौथी आत्महत्या झाली तर..., संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी चौथी आत्महत्या झाली तर…, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Oct 23, 2023 | 4:41 PM

VIDEO | मराठा समाजातील होणाऱ्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे तर मराठा आरक्षणासाठी चौथी आत्महत्या झाली तर राज्य सरकारवर गुन्हा दाखल करा, अशी आक्रमक मागणी संजय राऊत यांनी करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजातील होणाऱ्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले असून मराठा आरक्षणासाठी चौथी आत्महत्या झाली तर राज्य सरकारवर गुन्हा दाखल करा, अशी आक्रमक मागणी संजय राऊत यांनी करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने वैफल्य येत आहे ते निराश होत असल्याने मराठा तरूण आत्महत्या करत आहेत. याला जबाबदार हे राज्य सरकार आहे. आज तीन आत्महत्या झाल्यात उद्या चौथी आत्महत्या झाली तर मराठा समाजातील नेत्यांनी आणि संघटनांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

Published on: Oct 23, 2023 04:41 PM