AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी, मग ‘हा’ आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय

ऊस अडचणीतच आहे, तोडण्यायोग्य़ नाही अशी एक ना अनेक कारणे सांगत ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याची अडवणूक केली जाते. साखर कारखान्याकडून पैसे घेऊनही अधिकच्या पैशाची मागणी ही शेतकऱ्याकडे केली जाते. यावर यंदा मात्र, अंकुश येणार आहे. कारण पैशाची मागणी केली तर थेट ग्रामपंचयात कार्यालयात संबंधिताला तक्रार करता येणार आहे.

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी, मग 'हा' आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 11:35 AM

लातूर : कारखान्याला ऊस घालण्याच्या दृष्टीने शेतकरी एक ना अनेक पर्यायांचा अवलंब करीत असतो. मात्र, शेतकऱ्यांच्या याच परस्थितीचा फायदा हा शेतमजूर किंवा कारखान्याकडून नियुक्त केलेले मुकादम हे घेतात. ऊस अडचणीतच आहे, तोडण्यायोग्य़ नाही अशी एक ना अनेक कारणे सांगत ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याची अडवणूक केली जाते. साखर कारखान्याकडून पैसे घेऊनही अधिकच्या पैशाची मागणी ही शेतकऱ्याकडे केली जाते. यावर यंदा मात्र, अंकुश येणार आहे. कारण पैशाची मागणी केली तर थेट ग्रामपंचयात कार्यालयात संबंधिताला तक्रार करता येणार आहे.

साखर कारखाने सुरु झाले की, वेगवेगळ्या पध्दतीने जो-तो पैसे कमवण्याच्या यंत्रणेत गुंतलेला असतो. आता ऊस तोडणीची जबाबदारी ही साखर कारखान्यांची आहे. त्याअनुशंगाने मुकादम याला ऊस तोडणीचे पैसे देऊन कामगारांची सोय करण्यात आलेली असते. पण स्थानिक पातळीवर ऊस तोडणीस अडचणी आहेत, वाहन येऊ शकत नाही, ऊस हा तोडणीयोग्य नाही यासारखी कारणे सांगून पैशाची मागणी केले जाते. अशा प्रकारच्या तक्रारी थेट साखर आयुक्त कार्यालयापर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळेच आता साखर आयुक्त यांनी पैशाची मागणी केली तर तक्रार करण्याचे अवाहन केले आहेय त्यामुळे या गैरप्रकाराला आळा बसणार आहे.

ऊस गाळपाची चिंताच करु नका

गाळप हंगामात आपला ऊस कारखान्याला जातो की नाही, याची चिंता शेतकऱ्याला सतावत असते. आता पर्यंत दरवर्षी असेच झालेले आहे. यंदा ऊसाचे गाळप हे तब्बल 150 दिवस राहणार आहे. शिवाय केवळ साखर निर्मित एवढेच नाही तर यंदा इथेनॅालचीही निर्मिती करण्यात येणार आहेय त्यामुळे हंगाम संपेल आणि ऊस गाळप राहिल ही शंकाच ठेऊ नका असे अवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे अधिकचे पैसे ना ऊसतोड मजूराल ना मुकादमाला देण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

हा आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय

शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी एका कृषी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सुचना साखर कारखान्यांना करण्यात आलेली आहे. त्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक हा ग्रामपंचायतीच्या फलकावर नमूद केला जाणार आहे. शेतकऱ्याने त्या अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करून ही तक्राक साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या मेलवर पाठवण्याचे अवाहनही करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या तक्रारीमध्ये मजूर, मुकादम, वाहन क्रमांक ईत्यादी बाबींचा उल्लेख करण्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये पैशाच्या मागणीचे निष्पन्न झाले तर संबंधित मुकादमाच्या बिलातून ही रक्कम कापून घेतली जाणार आहे.

15 ऑक्टोंबर पासून कारखाने होणार सुरु

राज्यात 15 ऑक्टोंबर पासून ऊसाचे गाळप सुरु होणार आहे. त्या अनुशंगाने साखर कारखान्यावर लगबग ही सुरु झाली आहे. मात्र, अधिकचा ऊस कारखान्यावर घेण्याच्या दृष्टीने जाहीर केलेल्या तारखेच्या आगोदर कारखाने सुरु केले तर कारवाई केली जाणार आहे. शिवाय ऊस कोणत्या कारखान्याला घालायचा याचे स्वातंत्र हे शेतकऱ्यांना असणार आहे. (Action to be taken against sugar factories if money is demanded for sugarcane harvesting)

संबंधित बातम्या :

15000 शेतकरी एकवटले अन् इतिहास घडला..

24 लाख खर्चून पॉलिहाऊस उभारलं, लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच नाही, शेतकऱ्याने फुलबागेवर नांगर फिरवला!

आहो खरंच..! कांद्याचीही चोरी, नैसर्गिक संकटावर मात केली पण….

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.