AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural News : शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या, दोन एकर क्षेत्रावर…

tomato crop : टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्याने खामखेडा येथील शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकाला भाव मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Agricultural News : शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या, दोन एकर क्षेत्रावर...
tomato cropImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2023 | 9:52 AM
Share

नाशिक : नाशिक (nashik) जिल्ह्यातील खामखेडा (jamkheda) येथील शेतकरी समाधान आहेर यांनी दोन एकरमध्ये दोन लाख रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड (tomato crop) केली होती. मात्र सुरुवातीला दीडशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला. पाहिल्या दुसऱ्या तोड्यालाच चाळीस ते पन्नास रुपये बाजार भाव मिळू लागल्याने उद्विग्न होत आहेर यांनी टोमॅटो पिकात मेंढ्या तसेच जनावरांना चारावयास सोडून दिले. वाढत्या तापमानामुळे फळे लवकर परिपक्व होत असल्याने आवक वाढत आहे. मागणी कमी व परराज्यातील व्यापारी कमी असल्याने बाजारभाव गडगडल्याने टोमॅटो तोडून विकण्यासाठी देखील घरातून पैसा जात असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. समाधान आहेर यांनी आज आपल्या दोन एकर क्षेत्रावर टोमॅटो खाण्यासाठी मेंढ्या सोडल्या आहेत. कांद्यानंतर आता टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. टोमॅटोला सध्या मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. तोडणी केलेला माल बाजारात घेऊन जाण्यासाठी सुद्धा परवडत नसल्याने शेतकऱ्याने उद्विग्न होऊन टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या चरायला सोडल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात नाफेडमार्फत कांदा खरेदी

कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरवात करण्यात आली असून देवळ्याच्या उमराणे बाजार समितीत सायंकाळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या कांदा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कांद्याला प्रति क्विंटल 1156 रुपये इतका भाव मिळाल आहे. उद्यापासून जिल्ह्यात 14 फेडरेशन आणि नोंदणीकृत फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांमार्फत कांदा खरेदी केली जाईल, शिवाय नाशिक प्रमाणे पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यांतही प्रत्यक्ष कांदा खरेदी केला जाणार असल्याचे मंत्री भारती पवार यांनी सांगितले.

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

कांद्यासह शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहे.आता नाशिक जिल्ह्यात गावा गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे लोण पसरू लागलेले असून, नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड व रामनगर गावातही संतप्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तातडीची ग्रामसभा घेत गावबंदी करण्याचा ठराव केला. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावबंदी फलकाचे अनावरणही करण्यात आले. यावेळी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतमालाला हंगामीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात अशी आग्रही मागणीही शेतकऱ्यांनी केली.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.