AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान… तुमच्या रोजच्या आहारातील गहू- तांदळाची पौष्टीकता होतेय कमी ?

गहू- तांदूळ (Wheat-Rice) हे जवळपास जगभरात वापरले जाणारे प्रमुख अन्न आहे. सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रु नागरिकांमध्ये याचा सर्रास वापर हा होतोच. पण याच गहू आणि तांदळातील पौष्टीकता हळूहळू कमी होत आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सावधान... तुमच्या रोजच्या आहारातील गहू- तांदळाची पौष्टीकता होतेय कमी ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 6:36 PM

मुंबई : गहू- तांदूळ (Wheat-Rice) हे जवळपास जगभरात वापरले जाणारे प्रमुख अन्न आहे. सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रु नागरिकांमध्ये याचा सर्रास वापर हा होतोच. पण याच गहू आणि तांदळातील पौष्टीकता हळूहळू कमी होत आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)आणि विधानचंद्र कृषी विद्यापीठाशी संलग्न विविध संस्थांच्या संशोधकांनी दिलेल्या अहवालात हे उघड झाले आहे.

मुख्य अन्नाची पौष्टीकता झाली कमी

सर्वसामान्यांमध्ये आजही गहू आणि तांदूळ हे मुख्य अन्नच पोषक द्रव पुरवतात. सुमारे 10,000 वर्षांपासून तांदळाची लागवड केली जात आहे. एवढेच नाही तर जगभरातील सुमारे तीन अब्ज लोक ते अन्न म्हणून खातात असे म्हटले जाते. परंतु कृषी शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळले की तांदळातील आवश्यक पोषक तत्त्वांची मर्यादा आता 50 वर्षांपूर्वी होती तेवढी राहिलेली नाही. त्याचप्रमाणे गव्हातील लोहाचे प्रमाणही कमी झाली आहे.

16 जातीचे तांदूळ आणि 18 प्रकारच्या गव्हाचे विश्लेषण

आयसीएआर-इंडियन व्हीट आणि बार्ली रिसर्च इन्स्टिट्यूट येथे असलेल्या आयसीएआर-नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, चिनुराह राईस रिसर्च सेंटर आणि जीन बँक यांच्याकडून मिळालेल्या 16 प्रकारच्या तांदूळ आणि 18 प्रकारच्या गव्हाच्या बियाणांचे विश्लेषण केल्यानंतर संशोधक या निष्कर्षावर आले आहेत. या नोडल संस्था भारतातील जुन्या पिकांच्या जातींची जोपासना आणि साठवण करतात.

संशोधन कसे घडले?

शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत गोळा केलेल्या बिया अंकुरल्या आणि नंतर भांड्यांमध्ये त्याची लागवड केली. वनस्पतींना आवश्यक खतांची मात्रा देण्यात आली. पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची कापणी करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले. संशोधकांना असे आढळले की 1960 च्या दशकात सोडलेल्या तांदळाच्या वाणांच्या धान्यात पौष्टीकतेची घनता 27.1 मिलीग्रॅम/किलोग्रॅम होती. आणि किलोग्रॅम आणि 59.8 मिलीग्रॅम होती. हे प्रमाण 20 च्या

दशकात अनुक्रमे 20.7.6 मिलीग्रॅम/किलो आणि 43.1 मिलीग्रॅम/किलोपर्यंत घसरले. १९६० च्या दशकात गव्हाच्या जातींमध्ये झिंक आणि लोहाची घनता 33.3 मिलीग्रॅम/ होती. किलोग्रॅम आणि 57.6 मिलीग्रॅम/तास तर 2010 मध्ये लागवड करण्यात आलेल्या गव्हाच्या जातींमध्ये झिंक आणि लोहाचे प्रमाण अनुक्रमे 23.5 मिलीग्रॅम/किलो पर्यंत कमी करण्यात आले. (beware-is-the-nutrition-of-wheat-and-rice-in-your-daily-diet-less)

संबंधित बातम्या :

काजू लागवडीत महाराष्ट्राचे योगदान, ‘या’ जिल्ह्यांमध्ये भरघोस उत्पन्न

खाद्य तेलावरील आयातशुल्क कमी करुनही दर तेजीतच

एकरकमी एफ.आर.पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अनोखा ‘फंडा’

हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.