AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनलॉक होताच नागवेली पानाची मागणी वाढली, पान विड्याला लाली आली!

सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे. नागवेली पानाची मागणी वाढल्याने पान विड्याला लाली आली आहे. | Chewing Leaf nagveli Demand After Maharashtra unlock

अनलॉक होताच नागवेली पानाची मागणी वाढली, पान विड्याला लाली आली!
महाराष्ट्र अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे. नागवेली पानाची मागणी वाढल्याने पान विड्याला लाली आली आहे.
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 12:47 PM
Share

नांदेड : मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लॉकडाऊनमध्ये गेल्याने नागवेली पान मळ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. नागवेली पान मळ्यांसह अन्य पिकांनाही जोरदार फटका बसला. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतमालाची शेतातच नासाडी झाली तर शेतमालाला कवडीमोल दर मिळाला. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला. परंतु आता सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे. नागवेली पानाची मागणी वाढल्याने पान विड्याला लाली आली आहे. (Chewing Leaf nagveli Demand After Maharashtra unlock)

अनलॉक होताच पानाला मागणी वाढली

दुष्काळ आणि नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील शेतकरी नागवेली पानाची लागवड करतात नागवेली पान मळ्यातून वर्षाकाठीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते मात्र कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद असल्याने नागवेली पानाची मागणी बंद झाली होती. परंतु मागील आठवड्यापासून राज्यात अनलॉक करण्यात आल्याने नागवेली पानाची मागणी वाढली असून 50 ते 60 रुपये शेकडा पान विकलं जात आहे.

शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे फटका

लॉकडाऊनमध्ये नागवेली पानाला कवडीमोल दर मिळू लागला होता पान तोडणाऱ्या मजुरांची मजुरी सुद्धा निघत नव्हती. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पान तोडणी बंदच केली होती पान तोडणीस येत नसल्याने पान वाळून जात होते. लग्न सराईत नागवेली पानाला मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु लग्न सराईतच लॉकडाऊन असल्याने लग्न समारंभ बंद होते. म्हणून पानाला मागणीच नव्हती परंतु अनलॉक झाल्याने नागवेली पानाला मागणी वाढली आहे .

अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील पान श्रीरामपूर ,परभणी ,जळगांव , नाशिक , नगर, नागपूर आणि गुजरात मधील मोठ्या शहरात पाठवले जाते मात्र लॉकडाऊनमुळे हीच शहरे बंद असल्याने नागवेली पानाची मागणीच बंद झाली होती मात्र पुन्हा शहरे अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे.

(Chewing Leaf nagveli Demand in After Maharashtra unlock)

हे ही वाचा :

बोंडअळीचं संकट कमी, शेतकरी पुन्हा पांढऱ्या सोन्याकडे, बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा

एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.