AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thorat : राज्यात अराजक स्थिती, सत्तेपुढे सर्वकाही वाऱ्यावर, आर्थिक मदतीनेच शेतकऱ्यांना मिळेल दिलासा

जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून राज्यात सुरु झालेला पाऊस आता महिना संपत आला तरी सुरुच आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे राज्यातील 10 लाख हेक्टरावहून अधिकच्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाहीतर शेतजमिनही खरडून गेली आहे. खरीप हंगामातील पिकांचा पेरा होताच हे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. असे असताना आता पंचनामे आणि पीकपाहणीची औपचारिकता न करता थेट मदत मिळणे अपेक्षित आहे.

Balasaheb Thorat : राज्यात अराजक स्थिती, सत्तेपुढे सर्वकाही वाऱ्यावर, आर्थिक मदतीनेच शेतकऱ्यांना मिळेल दिलासा
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2022 | 12:59 PM
Share

मुंबई : लांबणीवर पडलेला (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तार आणि अतिवृष्टीमुळे (Crop Damage) पिकांचे झालेले नुकसान या दोन्ही बाबींना घेऊन राज्य सरकार टिकेचे धनी होत आहे. सध्या अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असून सरकार स्थापन होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला तरी खात्याला मंत्री नाही. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आता दिल्लीवारीमुळे राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. याला दुसरे तिसरे काही म्हणत नसून ही तर अराजक परस्थिती असल्याचे कॉंग्रेसचे नेते (Balasaheb Thorat) बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने बळीराजा अडचणीत आहे. आर्थिक मदतीशिवाय त्याचे हे नुकसान भरुन निघणार नाही. सध्याच्या स्थितीमध्ये पंचनामे देखील करता येत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने बागायतीसाठी हेक्टरी 1 लाख व जिरायत शेतीसाठी हेक्टरी 50 हजाराची मदत करण्याची मागणी केली आहे.

10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान

जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून राज्यात सुरु झालेला पाऊस आता महिना संपत आला तरी सुरुच आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे राज्यातील 10 लाख हेक्टरावहून अधिकच्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाहीतर शेतजमिनही खरडून गेली आहे. खरीप हंगामातील पिकांचा पेरा होताच हे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. असे असताना आता पंचनामे आणि पीकपाहणीची औपचारिकता न करता थेट मदत मिळणे अपेक्षित आहे. 10 लाख हेक्टरावर आता दुबार पेरणी होणेही शक्य नसल्याने नुकसान अटळ आहे. त्यामुळे तात्काळ मदत करण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

निसर्गाचा लहरीपणा त्यात महागाईचा सामना

शेतकऱ्यांनी एकरी हजारो रुपये खर्चून खरीप पेरण्या केल्या आहेत. यंदा तर खतासह बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. पण कर्ज आणि हातउसणे पैसे घेऊन शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. हे कमी म्हणून की काय आता सरकारने खाद्य पदार्थांवरही जीएसटी लागू केला आहे. सरकारच्या या धोरणामुळे जनतेमध्ये असंतोष आहे. वाढती महागाई, सरकारचा अवमेळ या बाबी जनतेच्या लक्षात येत असून योग्य वेळी ते यांना जागा दाखवून देतील असेही थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

असे असावे मदतीचे स्वरुप

अतिवृष्टीमुळे केवळ खरीप हंगामातील पिकांचेच नुकसान झाले असे नाही तर बागायती क्षेत्रालाही याचा फटका बसलेला आहे. बागांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने बागायतीसाठी हेक्टरी 1 लाख तर जिरायत शेतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत करण्याची मागणी बालासाहेब थोरात यांनी केली आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमकी भूमिका काय घेतंय हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.