Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Crop : कांदा टिकणार तरी कसा, आधी अवकाळी त्यानंतर उष्णतेचा फटका

आधी अवकाळी नंतर उष्णतेची लाट यामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान होत आहे. कांदा चाळीत साठवलेल्या कांद्याचे काय हाल आहेत. कांदा पिक घेण्याआधी काय काय करावे लागते, कांद्याला देखील कुठे उत्पन्न खर्च आहे, कांदा पिकाचं नेमकं गणित काय आहे, हे समजून घ्या

Onion Crop : कांदा टिकणार तरी कसा, आधी अवकाळी त्यानंतर उष्णतेचा फटका
ONION CROPImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 6:08 PM

मुंबई : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यामुळे साठवलेला कांदा खराब होवून पुन्हा त्याची विभागणी करुन चांगला कांदा वेगळा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसला असून जवळपास उत्पादनांमध्ये घट झाली आहे. येवला तालुक्यातील नागडे येथील शेतकऱ्यांनी अडीच एकर मध्ये कांदा पिक घेतले मात्र अवकाळी पावसामुळे उत्पादनास फटका बसला. साठवून ठेवलेले कांदेही अवकाळी पावसामुळे खराब होत आहे. यामुळे उत्पादन खर्च देखील निघणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

उष्ण हवामान आणि अवकाळीचा मोठा फटका

बदललेल्या हवामानाचा फटका हा शेतीवरही दिसू लागला आहे, यातच संपूर्ण महाराष्ट्राभर सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. काही महिन्यांआधी झालेल्या गारपीठाने बेजार झालेला शेतकरी अवकाळी पावसाला ही तोंड देत आहे. राज्यात नाशिक जिल्हात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक मध्ये निफाड येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होत आहे.

कांदा फेकून देण्याची वेळ

अवकाळी पावसामुळे खराब झालेल्या कांदे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यातच साठवून ठेवलेले कांदे ही खराब होत असल्याने त्याचीही विभागणी करुन चांगला कांदा वेगळा करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बाजारपेठेत कांद्याला भाव मिळत नसल्याने आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्याला या दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. नाशिक जिल्हा हा नेहमीच कांदा पिकवण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. दरवर्षी मे महिन्यात कांद्याचा भाव गडगडतो, पण यावेळी कांद्याचा भाव आणखी खाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अधिक उष्ण तापमानामुळे कांदा या कांदा चाळीत साठवणे देखील कठीण होत चालले आहे. यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. चाळीत जो कांदा सडतो, किंवा सडू शकतो असा कांदा निवडला जातो, यात शेतकऱ्यांना अधिक श्रम लागतात, पण खूप वेळ वाया जातो.

कांद्याचं गणित महाग

कांद्याला जेव्हा जास्त भाव असतो, तेव्हा कांद्याचे बियाणे आणि लागवडी योग्य कांद्याचे रोप देखील महाग असतं, अशी महागडी खरेदी केल्यानंतर जेव्हा कांद्याला भाव मिळत नाही, तेव्हा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो, कांद्याला खत आणि किटकनाशकांसह, मजुरीचा देखील खर्च मोठा आहे. कांद्याला पाच पैकी एका वेळेस भाव मिळू शकतो, तो देखील फार कमी प्रमाणात

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.