AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : खरेदी केंद्रावर हरभरा दराची हमी, बाजारपेठेतली आवक निम्याने घटली, सोयबीनही स्थिरावले

खुल्या बाजारपेठेपेक्षा हमीभाव खरेदी केंद्रावर अधिकचा दर असूनही शेतकरी हे केंद्राकडे पाठ फिरवत होते. राज्यात 1 मार्चपासून हमीभाव खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. आतापर्यंत नोंदणी आणि शेतीमालाची काढणी याच कामात शेतकरी व्यस्त होता. अखेर केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी होण्यास सुरवात झाली आहे तर त्याचा परिणाम थेट आता बाजारसमितीमधील शेतीमालाच्या आवकवर झालेला पाहवयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरच हरभरा विक्रीचे धोरण स्वीकारले असल्यानेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 25 हजार पोत्यांची आवक झाली आहे.

Latur Market : खरेदी केंद्रावर हरभरा दराची हमी, बाजारपेठेतली आवक निम्याने घटली, सोयबीनही स्थिरावले
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 12, 2022 | 3:44 PM
Share

लातूर : खुल्या बाजारपेठेपेक्षा (Guarantee Rate) हमीभाव खरेदी केंद्रावर अधिकचा दर असूनही शेतकरी हे केंद्राकडे पाठ फिरवत होते. राज्यात 1 मार्चपासून (Chickpea Crop) हरभरा हमीभाव खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. आतापर्यंत नोंदणी आणि शेतीमालाची काढणी याच कामात शेतकरी व्यस्त होता. अखेर केंद्रावर शेतकऱ्यांची (Farmer Registration) नोंदणी होण्यास सुरवात झाली आहे तर त्याचा परिणाम थेट आता बाजार समितीमधील शेतीमालाच्या आवकवर झालेला पाहवयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरच हरभरा विक्रीचे धोरण स्वीकारले असल्यानेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 25 हजार पोत्यांची आवक झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून 40 ते 45 पोत्यांची आवक होत होती. हमीभाव केंद्र आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये तब्बल 600 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे केंद्रावरील अटी-नियम मान्य करुन शेतकरी आता खरेदी केंद्रच जवळ करणार असेच शनिवारच्या आवकवरुन समोर येत आहे.

अधिकच्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात तर वाढ झालेली आहेच. शिवाय पोषक वातावरणामुळे अधिकचे उत्पादनही शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याची हीच वेळ असून हरभऱ्याबरोबर गहू आणि इतर कडधान्यही जोमात आहेत. यंदा वाढत्या उत्पादकतेचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आता खरेदी केंद्रावरील आवक वाढल्यानंतर खुल्या बाजारपेठेतील दर वाढतील असे चित्र आहे. मात्र, शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सरासरी 4 हजार 600 चा दर मिळाला आहे. तर 45 हजार पोत्यांवरील आवक थेट 25 हजारांवर येऊन ठेपलेली आहे.

सोयाबीनचे दरही अन् आवकही स्थिरच

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सोयाबीनचे दर हे 7 हजार 300 वर स्थिर झाले आहेत. गतआठवड्यात चढ-उतार झाल्यानंतर या आठवड्याच्या सुरवातीपासूनच दर हे स्थिर राहिलेले आहेत. याचा परिणाम आवक झाला असून वाढलेली आवक पुन्हा 18 हजार पोत्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा असतानाच दर हे स्थिर राहलेले आहेत.आता हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काय होणार हे पहावे लागणार आहे.

तुरीच्या आवकमध्ये मात्र वाढ

तुरीचेही खरेदी केंद्र राज्यभर सुरु आहेत पण, खरेदी केंद्रापेक्षा बाजारात तुरीला 300 रुपये अधिकचा दर आहे शिवाय रोख रक्कम शेतकऱ्यांना मिळत असल्याने बाजार समितीमध्येच विक्री केली जात आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 26 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. तर दर हा 6 हजार 600 रुपये एवढा आहे.

संबंधित बातम्या :

Video: अमरावती बाजारसमितीत हमालाची गुंडगिरी, शेतकऱ्याला मारहाण, बाजारसमितीचं कारवाईचं आश्वासन

Drone Farming : शेत शिवारात पोहचलं ड्रोन, शेतकऱ्यांना प्रशिक्षण अन् काय आहे जिल्हा परिषदेचे धोरण?

Agricultural Pump : विद्युत पुरवठ्याचा कालावधी ठरला आता वीज तोडणी मोहीम बंद करण्यासाठी आंदोलन

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली