Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार खराब झालेला गहू देखील खरेदी करणार ?

सरकार प्रत्येकवर्षी 6 टक्क्यांपेक्षा जास्त खराब झालेले धान्य खरेदी करीत नाही. परंतु यावर्षी युपीचं राज्य सरकारने हे प्रमाण 18 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार खराब झालेला गहू देखील खरेदी करणार ?
Unseasonal RainImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 2:27 PM

नवी दिल्ली : देशात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे (Farmer)चांगलेचं नुकसान केले आहे. देशात अनेक राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. यावर्षी पिकांची इतकी नासाडी झाली आहे की, धान्य खराब झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अधिक चिंतेत आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची अजून शक्यता आहे. पण असं असताना उत्तर प्रदेश (uttar pradesh) सरकारने शेतकऱ्यांकडे असणारा खराब गहू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकार आतापर्यंत 6 टक्क्यांपेक्षा जास्त खराब झालेले धान्य खरेदी करीत नव्हतं. परंतु यंदा शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झाल्यामुळे सरकारने त्यात थोडासा बदल केला असून प्रमाण 18 टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने देखील उत्तरप्रदेशच्या अन्न आणि पुरवठा विभागाकडून परवानगी मिळवली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रति क्विंटल दरात कपात

2125 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किमतीवर गहू विकला जात आहे. सरकारच्या सुचनेनुसार 6 टक्क्यांपर्यंत गहू खराब झाला असल्यास कसल्याही दरात कसल्याची प्रकारची कपात केली जाणार नाही. परंतु 6 ते 8 टक्क्यांपर्यंत गहू खराब झाला असल्यास 5.31 रुपये प्रति क्विंटल इतके पैसे कापले जाणार आहेत. 8 ते 10 टक्क्यांपर्यंत खराब झालेला गहू असल्यास 10.62 रुपये प्रति क्विंटल पैसे कापले जाणार आहेत. 10 ते 12 टक्के दराने 15.93 रुपये प्रति क्विंटल पैसे कापण्यात येतील , 12 ते 14 टक्के दराने 21.25 रुपये प्रति क्विंटल पैसे कापण्यात येतील, 14 ते 16 टक्के दराने 26.56 रुपये प्रति क्विंटल आणि 26.55 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 16-18 टक्के आणि कमी केल्यावर 31.87 रुपये प्रति क्विंटल दराने कपात केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात सुध्दा अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही हवामान बदलत असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.