Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : हवामान विभागाचे शुभसंकेत, खरिपाबाबत उपमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना काय सल्ला ?

नियमित कर्ज अदा कऱणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने सत्ता स्थापनेच्या दरम्यान केलेल्या कर्जामाफी वेळी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मध्यंतरी तिजोरीत खडखडाट होता तर पुन्हा राज्यावर कोरोनाचे संकट ओढावले होते. त्यामुळे ही रक्कम देणे शक्य झाले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

Kharif Season : हवामान विभागाचे शुभसंकेत, खरिपाबाबत उपमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना काय सल्ला ?
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 4:53 PM

मुंबई : गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील उत्पादन घटले होते. यंदा हंगाम सुरु होण्यापूर्वीच (Meteorological Department) हवामान विभागाने शुभसंकेत दिले आहेत. (Monsoon) मान्सूनचे वेळेत आगमन होणार असल्याने उत्पादनात वाढ होईल शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढावणार नाही. त्यामुळे पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे उरकणे गरजेचे असल्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार तर प्रयत्नशील राहणारच आहे. मात्र, शेतकऱ्यांनीही कुठेही कमी न पडता उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रोत्साहनपर रकमेचा पुन्नरउच्चार

नियमित कर्ज अदा कऱणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने सत्ता स्थापनेच्या दरम्यान केलेल्या कर्जामाफी वेळी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मध्यंतरी तिजोरीत खडखडाट होता तर पुन्हा राज्यावर कोरोनाचे संकट ओढावले होते. त्यामुळे ही रक्कम देणे शक्य झाले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. मध्यंतरी अर्थसंकल्पीय अधिवनेशनात ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरीत देण्याची घोषणा त्यांनी केली होती मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार रकमेतून प्रोत्साहनच मिळालेले नाही.

तब्बल 10 वर्ष कृषी प्रशिक्षण संस्था इमारतीचे काम

प्रादेशिक कृषी प्रशिक्षण संस्थेचे काम तब्बल 10 वर्षापासून सुर आहे. 10 वर्ष काम रेंगाळणे म्हणजे हा आमचा अपमान असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. काम पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये सातत्य राहिले तरी दर्जाही टिकवता येतो. आता अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु

राज्याचे राजकारण हे खालच्या पातळीवर आले आहे. यामुळे सामाजिक सलोखा टिकून राहतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही पण काही जणांकडून तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. जे राज्यासाठी धोक्याचे आहे. राजकीय स्वार्थासाठी कोणत्या पातळीवर जावे यासाठीही काही मर्यादा आहेत. केवळ एखादा मुद्दा घेऊन शांतता भंग केली जात आहे. जनतेचे प्रश्न, विकासाचे राजकारण करण्याची खरी गरज असताना वेगळेच मुद्दे घेऊन जनतेचे लक्ष विचलीत केले जात असल्याचे सांगत अजित पवार यांनी विरोधकांवर टिका केली.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.