AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Suicide : सन 2020 मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे. कारण सन 2020 मध्ये देशात तब्बल 5 हजार 979 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. हा देशातला आकडा झाला तरी या काळात सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्र राज्यात झाल्या आहेत. 2019 च्या तुलनेत यामध्ये घट झाली असली तरी काळाच्या ओघात होत असलेल्या बदलानुसार 5 हजार 979 हा आकडाही काही कमी नाही.

Farmer Suicide : सन 2020 मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 6:21 PM

मुंबई : काळाच्या ओघात केंद्र, राज्य सरकारने एक ना अनेक कृषी योजना उत्पादन वाढविण्यासाठी राबवल्या आहेत. शिवाय अत्याधुनिक प्रणालीचाही वापर या क्षेत्रात होत आहे. हे सर्व होत असताना मात्र, (Farmer Suicides) शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे. कारण सन 2020 मध्ये देशात तब्बल 5 हजार 979 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. हा देशातला आकडा झाला तरी या काळात सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्र राज्यात झाल्या आहेत. 2019 च्या तुलनेत यामध्ये घट झाली असली तरी काळाच्या ओघात होत असलेल्या बदलानुसार 5 हजार 979 हा आकडाही काही कमी नाही.

देशात दरवर्षी शेतकरीच आत्महत्य़ा अधिकच्या असून याबाबत (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीच संसदेत ही माहिती दिली आहे. मात्र, यामागची कारणे त्यांनी स्पष्ट केली नसली तरी मध्यंतरी एनसीआरबी ने अहवाल प्रसिध्द केला होता. यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेती नुकसानीच्या नैराश्यातून शेतकरी आपले जीवन संपवत असल्याचा उल्लेख होता. त्यामुळे एकीकडे आपण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हणत असलो तरी हे विदारक चित्र असलेली दुसरी बाजू आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वाधित आत्महत्या

देशात महाराष्ट्रात 2 हजार 567 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर यामध्ये मराठवाडा विभागात आत्महत्या अधिकच्या असल्याची नोंद एनसीआरबी ने अहवालात म्हटलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे शेती व्यवसयाचे होत असलेले नुकसान यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. याबाबत आत्महत्यामागचे कारण केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले नसले तरी एनसीआरबी यापूर्वी दिलेल्या अहवालात याची नोंद केलेली आहे. मराठवाड्यातील शेती ही पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. यातच गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उत्पान्नात घट आणि वाढत चाललेला कर्जाचा बोजा यामुळे नैराश्यात असलेल्या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलेले आहे.

अशी आहे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी

2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे 2 हजार 567 घटना ह्या महाराष्ट्रात घडल्या आहेत तर त्यापाठोपाठ कर्नाटक राज्यात 1 हजार 72, आंध्र प्रदेश 564, तेलंगणा 466, मध्यप्रदेश 235, चंडीगढ 227,उत्तर प्रदेशमध्ये 87 तर तामिळनाडू राज्यात 2020 मध्ये 79, केरळमध्ये 57, आसाम 12 तर सर्वात कमी शेतकरी आत्महत्या ह्या मेघालय आणि मेझोराम राज्यात झाल्या आहेत.

या कारणांचाही आहे समावेश

कौटुंबिक समस्या, आजारपण, व्यसन, विवाह संबंधित विविध मुद्दे,संपत्तीचा वाद, व्यावसायिक समस्या अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे यांचे एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

करडई 10 हजारावर तरीही शेतकऱ्यांचा भर हरभाऱ्यावरच, काय आहेत कारणे?

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात

कोरोनामुळे महागला ‘मालावी हापूस’चा गोडवा, रत्नगिरीतला हापूस कसा झाला ‘मालावी’?

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.