AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा

शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे.

एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 6:30 PM

मुंबई : शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. (Change in agricultural system) उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे. (integrated farming system) एकात्मिक शेती पध्दत आता रुजत असून नवनविन प्रयोगांचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

अनेक शेतकरी हे एकत्र येत विविध पीकाचे उत्पादन घेऊन त्याला बाजारपेठ मिळेपर्यंत एकत्रीत शेती करुन लाखोंची कमाई करीत आहेत. त्यामुळे एकात्मिक शेती म्हणजे काय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कसा विकास झाला आहे ते आपण पाहणार आहोत.. पारंपारिक पध्दतीने शेती करणारे शेतकरी हे सुरुवातीला नवीन मॉडेल स्वीकारण्यास टाळाटाळ करतात, परंतु नफा कमावण्यास सुरुवात झाली की यामध्येच वेगवेगळे उपक्रम करतात. अशाच प्रकारचे एक मॉडेल आहे एकात्मिक शेती. मोठ्या संख्येने शेतकरी हे शेत जमिन दत्तक घेतात आणि उत्पादनात वाढ करीत आहेत.

एकात्मिक शेती म्हणजे काय?

एकात्मिक शेती ही लहान-मोठे शेतकरी एकत्र य़ेऊन केली जाणारी अत्याधुनिक शेती पध्दत आहे. शिवाय मोठे शेतकरीही या प्रणालीद्वारे शेती करून नफा कमवू शकतात. एकात्मिक कृषी व्यवस्थेचे मुख्य उद्दीष्ट शेतजमिनीच्या प्रत्येक भागाचा योग्य वापर करणे हा आहे. यामध्ये शेतकरी हे एकाच वेळी वेगवेगळी पिके, फुले, भाज्या, गुरांचे संगोपन, फळउत्पादन, मधमाशीपालन, मत्स्यपालन इत्यादी करू शकता. यातून केवळ उत्पादन वाढविणे हाच उद्देश आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या संसाधनांचा पूर्ण वापर करुन उत्पादन कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रीत केले जाते. खर्च कमी आणि उत्पादकता अधिक हाच उद्देश या एकात्मिक शेती पध्दतीचा आहे. एकात्मिक कृषी व्यवस्था पर्यावरणपूरक असून शेतीची खतशक्तीही वाढवते.

एकात्मिक शेतीचा फायदा काय?

– उत्पादकता वाढते. – शेतकरी अधिकाधिक नफा कमावतात. – शेतीच्या कामांचा खर्च कमी करतो. – शेताची खत क्षमता वाढते. – संरचनांचा संपूर्ण वापर होतो. – जोखीम कमी असते. – रोजगाराच्या संधी निर्माण होतात.

एकात्मिक शेता नेमकी कशी केली जाते?

झारखंडची राजधानी रांची जिल्ह्यात एका गावात शेतकरी एकात्मिक शेती करत आहेत. ते पाच एकर जमिनीवर धानासह फुले आणि भाजीपाला पिके घेत आहेत. याशिवाय येथे मासे शेती, कुक्कुटपालन, शेळी पालन आणि दूधही तयार केले जात आहे. येथील शेतकरी सांगतात की, ते गरजू शेतकऱ्यांना कृषी अवजारेही भाड्याने देतात. त्यातूनही त्यांना उत्पन्नही मिळत राहते. शेतकऱ्याच्या मते पाच एकर जमिनीवर अनेक पिके, फुले, भाज्या आणि पशुसंवर्धन असे व्यवसाय केले जात आहेत.

शिवाय जनावरांच्या चाऱ्याची कमतरता नाही आणि त्यांच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होतो. वेगवेगळ्या पिकांच्या पेरणीमुळे शेताची खतशक्ती वाढते आणि उत्पन्नही वाढते. एकात्मिक शेती पध्दतीमुळे दरवर्षी पाच एकरात 8 लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. (Increase in production due to integrated farming system and development of farmers also)

संबंधित बातम्या :

पहिला दिवस ढगाळ वातावरणाचा, कांद्याची काळजी घ्या अन्यथा वांदाच…

कापूस उत्पादकांना अधिकच्या दराची संधी, दिवाळी पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ‘स्टॅकिंग’ पध्दत ; उत्पादन अधिक नुकसान कमी

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...