AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा “अकोले पॅटर्न”, लाभ कुणाला? प्लॅन काय? वाचा एका क्लिकवर

प्रख्यात शेतीतज्ज्ञ, 'ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, (OBC Indian Chamber of Commerce) इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे चेअरमन प्रा. काशीराम वंजारी हे शेतकऱ्यांसाठी आता 'अकोले पॅटर्न' घेऊन आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अकोले पॅटर्न, लाभ कुणाला? प्लॅन काय? वाचा एका क्लिकवर
काशिराम वंजारी यांंचा अकोले पॅटर्न
| Updated on: Feb 21, 2022 | 5:39 PM
Share

मुंबई : आपण शेतकऱ्याला (Farmer) जगाचा अन्नदाता तर म्हणतो. मात्र एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरी इतर अडचणी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांना हादरे देणारा बहुजन महासंघाचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांचा ‘ अकोला पॅटर्न’ (Akola Pattern) एकेकाळी गाजला होता. त्यानंतर गेल्या 11 महिन्यात सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रख्यात शेतीतज्ज्ञ, ‘ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, (OBC Indian Chamber of Commerce) इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे चेअरमन प्रा. काशीराम वंजारी हे शेतकऱ्यांसाठी आता ‘अकोले पॅटर्न’ घेऊन आले आहेत. बळीराजाला वाचवण्यासाठी रामबाण उपाय ठरणारा एक फॉर्म्युला ते उद्या बुधवारी 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत जाहीर करणार आहेत. त्यासाठी दुपारी 3 वाजता ते मुंबई मराठी पत्रकार संघात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसहित मीडियाशी संवाद साधणार आहेत. गेल्या अनेक महिन्यातला शेतकरी आत्महत्येचा आकडा अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे बळीराजाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी हा पॅटर्न आशादायी ठरणार आहे.

काळीज करपवणारा आत्महत्येचा आकडा

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने केलेली आत्महत्या दुःखद आणि धक्कादायक असल्याने ती बातमी राष्ट्रीय होते, यावर आमचे दुमत नक्कीच नाही. पण राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंताजनक आणि कृषीप्रधान देशासाठी लांच्छनास्पद आहेत. हे आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी ओबीसी इंडियन चेंबर झटत आहे. आमच्या या प्रयत्नांना हातभार लावून सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्या चेंबरतर्फे प्रा. सुरेश जांभुळकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. गेल्या दोन वर्षात तर कोरोनामुळे अनेक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. कारण सततच्या लॉकडाऊनचीही शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. आता कुठे कोरोनाचे आकडे कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.

शेतसारा भारण्याचीही ऐपत नाही

लहरी निसर्ग आणि दलालांची मर्जी, मनमानी यांच्या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे. लागवड खर्चात वाढ, उत्पादनात घट आणि शेतीमालाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा आणि बेभरवशाचा बनला आहे असे सांगतानाच विदर्भातील बड्या बड्या शेतकऱ्यांची शेतसारा भरण्याची सुद्धा ऐपत राहिलेली नाही, याकडे ओबीसी इंडियन चेंबरने लक्ष वेधले आहे. कधी कोरोना, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी अशा सतच्या संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. त्यातच पाचवीला पुजलेला अवकाळी अनेकदा शेतकऱ्यांची हाततोंडाला आलेली पिकं घालतो, त्यामुळे या नव्या अकोले पॅटर्नकडून शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आहे.

परदेशी तेलबिया ‘जोजोबा’ची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, जाणून घ्या सर्वकाही

निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी ‘ही’ वेळ

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.