AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani : राज्य सरकारकडून मराठवाड्यातील योजनांना ‘ब्रेक’, कृषी महोत्सवातही ‘राजकारण’

हाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विकास कामांना तर खीळ बसलेलीच आहे पण ज्या योजना राबवल्या जात होत्या त्या देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे सरकार स्थगितीचे सरकार असून आतापर्यंत मराठवाडा विकास महामंडळ योजना बंद केली , जलयुक्त शिवार योजना बंद केली, मराठवाडा वॉटरग्रेड योजना बंद केली यामुळे राज्याचे मोठे नुकासन झाल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

Parbhani : राज्य सरकारकडून मराठवाड्यातील योजनांना 'ब्रेक', कृषी महोत्सवातही 'राजकारण'
परभणी येथे कृषि महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रांची माहिती मिळणार आहे.उद्घाटन प्रसंगी डॉ. भागवत कराड, बबनराव लोणीकर हे उपस्थित होते.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 06, 2022 | 4:49 PM
Share

परभणी : कार्यक्रम धार्मिक असो की सांस्कृतिक त्याला राजकीय किनार असल्याशिवाय तो पूर्णच होत नाही. आता (Parbhani) परभणी येथे कृषी (Agricultural Festival) संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून शेतकऱ्यांना शेती विषयी माहिती आणि (State-of-the-art technology) अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे क्रमप्राप्त असताना या महोत्सावाच्या उद्गाघटन प्रसंगी उपस्थितांनी राजकीय मतभेद करण्यातच धन्यता मानली. राज्य सरकारने मराठवाड्यातील अनेक योजना बंद पाडल्या त्यामुळे या भागातील विकास खुंटला असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले. मात्र, परभणीत होऊ घालत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या महोत्सवात शेती यंत्र तसेच विविध साहित्यांची रेलचेल होती. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही इतर शेतकऱ्यांना मिळाली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराडांच्या हस्ते उद्घाटन

परभणी येथे आयोजित केलेल्या कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्याने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. महोत्सावाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी लावलेले स्टॉल हेच आकर्षणाचे केंद्रबिंदू होता. या स्टॉलमुळे वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना मिळाली तर विविध यंत्र सामुग्रीही पाहवयास मिळाली. काही शेतकऱ्यांनी उपयोगी साहित्याची खरेदी केली होती. यावेळी बबनराव लोणीकर, आनंद भरोसे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

मराठवाड्यातील योजना बंद, विभागाचे न भरुन निघणारे नुकसान

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विकास कामांना तर खीळ बसलेलीच आहे पण ज्या योजना राबवल्या जात होत्या त्या देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे सरकार स्थगितीचे सरकार असून आतापर्यंत मराठवाडा विकास महामंडळ योजना बंद केली , जलयुक्त शिवार योजना बंद केली, मराठवाडा वॉटरग्रेड योजना बंद केली यामुळे राज्याचे मोठे नुकासन झाल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.एवढेच नाही तर कृषी महोत्सावात इंधन दरवाढीचा विषय चर्चेला गेला. याकरिताही राज्य सरकारच जबाबदार असल्याचे कराड यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी कृषी क्षेत्राच्या व्यासपीठाहूनही राजकीय स्वार्थच साधल्याने शेतकऱ्यांना जे अपेक्षित होते ते मिळाले नाही.

राज्य अंधारात, विकासही खुंटला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास योजनांना खीळ बसली आहे तर ज्या योजनांचे काम सुरु होते ते बंद करण्याचे पापही याच सरकारने केले आहे. केवळ नियोजनाअभावी राज्यात विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. वीज,पाणी नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा घणाघात लोणीकर यांनी केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.