AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Season: उन्हाळ्यात फळबागांचे योग्य व्यवस्थापन केले तरच उत्पादन भर, लिंबूवर्गीय फळबागांचे ‘असे’ करा नियोजन!

अवकाळी काय अन् वाढत्या उन्हाच्या झळा काय...दोन्हीमुळेही फळबागांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे फळबागांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. तीव्र उष्णता आणि झळा यांचा परिणाम संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये होतो. प्रामुख्याने नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराची लहान फळांची फळगड, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात. राज्यातील अमरावती, नागपूर आणि मराठावड्यातील काही भागातील फळपिकांचे नुकसान झाले आहे.

Summer Season: उन्हाळ्यात फळबागांचे योग्य व्यवस्थापन केले तरच उत्पादन भर, लिंबूवर्गीय फळबागांचे 'असे' करा नियोजन!
वाढत्या उन्हामध्ये फळबागांचे व्यवस्थापन गरजेचे आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 5:18 AM

औरंगाबाद : (Unseasonable Rain) अवकाळी काय अन् वाढत्या उन्हाच्या झळा काय…दोन्हीमुळेही फळबागांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे (Orchard) फळबागांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. तीव्र उष्णता आणि झळा यांचा परिणाम (fruit crop) संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये होतो. प्रामुख्याने नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराची लहान फळांची फळगड, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात. राज्यातील अमरावती, नागपूर आणि मराठावड्यातील काही भागातील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील ही दुष्परिणामांची दाहकता कमी करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर होणे गरजेचे आहे.

नव्याने लागवड केलेल्या रोपांची निघा

1) सध्याच्या वाढत्या उन्हामुळे नव्याने म्हणजे 1 वर्ष झालेल्या कलमांची, रोपांची कोवळे शेंडे सुकतात, पाने गळतात. अशा प्रसंगी नवीन लागवडीच्या रोपेजवळील किमान 2 ते 3 फूट परिघामधे सेंद्रिय पदार्थांचा किमान 10 सेंटिमीटर जाडीचा थर देऊन आच्छादन करावे लागणार आहे.

2) कलमांच्या जवळ 2 फूट अंतराच्या परिघात गोलाकार पद्धतीने बोरू बी पेरावेत. यामध्ये बोरूची झपाट्याने वाढ होऊन सभोवताली सावली राहते. परिणामी, कलमांचे तीव्र उन्हापासून व उष्ण वारा यापासून संरक्षण होते. बांबू, कामठ्यांच्या साह्याने तुराट्याचे झाप किंवा कूड तयार करून ते दक्षिण पश्चिम बाजूंनी लावावेत.

3) कोणत्याही फळाचे कलम हे 1 ते 3 वर्षे होईपर्यंत झाडांचा बुडाशी छोटा पाण्याचा माठ ठेऊन झाडांना पाणी देता येते. त्यासाठी छोट्या मडक्याला बुडाशी एक बारीक छिद्र पाडून ठेवावे लागणार आहे. त्यातून सुती कपड्याची वात बाहेर काढावी लागणार आहे.

4) उन्हामुळे बाष्पीभवन व पणौत्सर्जनाचा वेग अधिक असतो, त्यामुळे कलमे, रोपे यांची पाने लवकर कोमेजतात. अशा वेळी पोटॅशिअम नायट्रेट ( 13:0:45 ) 1 किलो प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे 20-25 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यामुळे पानांतील पर्णोत्सर्जनाचा वेग कमी होतो.

मोठी झाडे व बागेचे नियोजन

पाण्याची कमतरता असणाऱ्या फळबागांमध्ये पाणी बचतीसाठी उन्हाळी हंगामात सेंद्रिय पदार्थांचे 10 सेंटिमीटर थर देत आच्छादन करावे लागणार आहे. किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपर (100 मायक्रॉन ) आच्छादन करावे लागते यामुळे झाडाजवळ ओलावा टिकून राहतो, आच्छादनामुळे जमिनीवर सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तणाची वाढ होत नाही,जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन केले असल्यास कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते तर उन्हाळ्यात पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येते.

उन्हाळ्यामध्ये सिंचनाचे व्यवस्थापन महत्वाचे

हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही भारी जमिनीपेक्षा कमी असते. हलक्या जमिनीला वरचेवर पाणी द्यावे लागते, तर भारी जमिनीमध्ये दोन पाणी पाळ्यांतील अंतर कमी असले तरी चालते. ठिबक सिंचनाने अत्यंत काटेकोरपणे व अचूक मोजून पाणी देता येते. पाण्याचा अपव्यय टाळला गेल्याने पाण्यामध्ये 40 ते 50 टकके पाणी बचत होते. यातून रासायनिक खतेही पाण्यासोबत मुळांच्या कक्षेमध्ये देता येतात. खतांची 30 टक्क्यांपर्यंत बचत होते. पाणी उपलब्ध असल्यास आंबिया बहराची फळे टिकून ठेवण्यासाठी ओलित सुर ठेवणे गरजेचे आहे.

(सदरील बातमीतील माहिती ही डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर यांच्या लेखातील आहे. तरी शेतकऱ्यांनी तज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थापन करावे)

संबंधित बातम्या :

Central Government : Zero Budget शेतीसाठी मोठी आर्थिक तरतूद, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

Solapur : अखेर ज्याची भीती तेच घडले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडले

Sugarcane Sludge : ऊसतोड मजुरांसाठी कायपण! गाळप पूर्ण होण्यासाठी कारखान्याची अनोखी शक्कल

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...