Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Puntamba : आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना नोटीसा, काय आहे शेतकऱ्यांचा आरोप?

राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यावर आंदोलन छेडले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्याता आले होते. असे असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे तर सरकराने दुर्लक्ष केलेच आहे शिवाय आंदोलकांनाच नोटीसा बजावल्या आहेत.

Puntamba : आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना नोटीसा, काय आहे शेतकऱ्यांचा आरोप?
पुणतांबा शेतकरी आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 2:32 PM

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा येथे 1 जून रोजी 5 वर्षानंतर पुन्हा शेतकरी आंदोलनाला सुरवात झाली आहे. 5 दिवस हे (Dharna movement) धरणे आंदोलन होणार असताना पहिल्याच दिवशी हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले आहे. कारण बुधवारी सकाळी बळीराजाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनाला सुरवात होताच अवघ्या काळात वेळात आंदोलनाचे नेते आणि पुणतांबा गावचे सरपंच धनंजय धनवटे यांच्यासह इतरांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांचे आंदोलन हे मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी पाच दिवसांमध्ये आणखीन काय घडामोडी घडणार हे पहावे लागणार आहे.

आंदोलनावर शेतकरी ठाम

राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यावर आंदोलन छेडले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्याता आले होते. असे असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे तर सरकराने दुर्लक्ष केलेच आहे शिवाय आंदोलकांनाच नोटीसा बजावल्या आहेत. असे असले तरी 5 दिवस धरणे आंदोलन पारच पडणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.

पुणतांब्याच्या आंदोलनाला वेगेळेच महत्व

शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या घेऊन पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर मोठ्या सभामंडपात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु झाले आहे. आज आंदोलनाचा पहिला दिवस असला तरी पुढील काळात या ठिकाणी राज्यभरातून शेतकरी येणार आहेत. शिवाय 2017 साली येथूनच सुरु झालेले आंदोलन राज्यभऱ पसरले होते आणि या आंदोलनानंतर राज्य सरकारलाही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे येथील आंदोलनाला यश मिळतेच अशी धारणा झाली असून आता पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने कारवाईच्यान अनुशंगाने पावले उचलली आहेत.

हे सुद्धा वाचा

या आंदोलकांना नोटीसा

पुणतांबा ग्रामपंचायतीच समोर बुधवारी सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरवात झाली होती. दरम्यान, दोन तासाचा आवधी जाताच गावचे सरपंच धनंजय धनवटे , सुहास वहाडणे , धनंजय जाधव , बाळासाहेब चव्हाण , सुभाष कुलकर्णी , सभाष वहाडणे या नेत्यांना सीआरपीसी १४९ अन्वये नोटीस बजावली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याचे कारण नोटीसीत नमुद करण्यात आले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये आम्ही आंदोलनावर ठाम असल्याची भुमिका आंदोलकांनी व्यक्त केलीय .

अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.