AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Organic Farm : आता सेंद्रीय शेतीमालाचेही प्रमाणीकरण..! नेमका फायदा काय होणार ?

काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय शेतीमालाच्या मागणीत वाढ होत आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न केलेला आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या शेतीमालाला मागणी अधिक आहे. पण सेंद्रीय शेतीमालाच्या इतर मालाचीही खरेदी-विक्री होऊ शकते. बोटावर मोजण्या इतपतच शेतकरी याची तपासणी करुन सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतात. पण सर्वजणच या पध्दतीचा अवलंब करतील असे नाही.

Organic Farm : आता सेंद्रीय शेतीमालाचेही प्रमाणीकरण..! नेमका फायदा काय होणार ?
सेंद्रीय पध्दतीने उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचे आता प्रमाणीकरण केले जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे.
| Updated on: May 05, 2022 | 10:21 AM
Share

पुणे :  (Certification of seeds) बियाणांचे प्रमाणीकरण केल्याशिवाय त्याचा पेरा करु नये याबाबत (Agricultural Department) कृषी विभागाकडून जनजागृती केली जाते. त्यामुळे बियाणांमधील गुणधर्म स्पष्ट होतात आणि उत्पादनवाढीसाठी त्याचा उपयोग केला जातो. बियाणांसाठी अशाप्रकारे महत्व दिले जात असले तरी (Organic Farm) सेंद्रीय शेतीमालाबद्दल अद्यापही उदासिनताच आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीमालाची गुणवत्ता तपासणीसाठी आता प्रमाणीकरणाची स्वतंत्र्य यंत्रणेची स्थापना केली जाणार आहे. यासंबंधी यापूर्वीच घोषणा झाली असली तरी अंमलबजावणी मात्र, दिवाळीपासून होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रीय शेतीमालाची मागणी होते पण प्रत्यक्ष तो शेतीमाल सेंद्रीय पध्दतीने पिकवला आहे का? याचे मूल्यमापन होत नाही. त्यामुळेच ही प्रमाणीकरणाची यंत्रणा उभारली जाणार आहे.

नेमका फायदा काय होणार?

काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय शेतीमालाच्या मागणीत वाढ होत आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न केलेला आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या शेतीमालाला मागणी अधिक आहे. पण सेंद्रीय शेतीमालाच्या इतर मालाचीही खरेदी-विक्री होऊ शकते. बोटावर मोजण्या इतपतच शेतकरी याची तपासणी करुन सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतात. पण सर्वजणच या पध्दतीचा अवलंब करतील असे नाही. त्यामुळे ही प्रमाणीकरणाची पध्दत रुळली तर त्याचा फायदा ग्राहकांना तर होणार आहेच शिवाय दर्जात्मक शेतीमाल नागरिकांना मिळणार आहे.

दिवाळीपासून यंत्रणा उभी राहणार

राज्य सरकारने बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या धर्तीवर सेंद्रीय शेताीमाल प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. बीज प्रमाणीकरण यंत्रणेप्रमाणेच ही शेतीमाल प्रमाणीकरणाची संस्था नोंदणी करावी लागणार आहे. 11 जणांची कार्यकरणी निश्चित करण्यात आली आहे. 2015-16 पासूनच सेंद्रीय शेतीमाल प्रमाणीकरण उभारण्याच्या हलचाली सुरु होत्या अखेर दिवाळीपर्यंत गही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असून याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे.

राज्यात वाढणार सेंद्रीय शेतीमालाचे उत्पादन

अपेडाने सेंद्रीय शेतीमाल प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची अट घातली होती. त्यामुळे ह्या यंत्रसामुग्री उभारण्याचे काम रखडले होते. पण आता हा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच ही प्रणाली उभराली जाणार आहे. शिवाय सेंद्रीय शेतीमालाच्या प्रमाणीकरणमुळे ग्रामस्थांचा चांगल्या दर्जाचा माल मिळणारच आहे पण सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.